spot_img
अहमदनगरAhmednagar Today News: जितेंद्र आव्हाड यांच वादग्रस्त विधान!! भाजप आक्रमक, रास्तारोको करत...

Ahmednagar Today News: जितेंद्र आव्हाड यांच वादग्रस्त विधान!! भाजप आक्रमक, रास्तारोको करत प्रतिमेला जोडे मारो अंदोलन

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
प्रभू श्रीरामांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने जुने बस स्थानक येथे नगर-पुणे महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. आव्हाड यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

श्रीराम भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आव्हाड यांचा निषेध नोंदवून जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शहर सरचिटणीस सचिन पारखे, प्रशांत मुथा, बाबासाहेब सानप, गोपाल वर्मा, मयूर जामगावकर, सचिन पावले, युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ, उपाध्यक्ष स्वप्निल बेद्रे आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रभू श्रीरामांबाबत आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना शहरात त्याचे पडसाद उमटले. भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य निंदनीय असून, ते प्रभू श्रीराम यांच्या भक्तांच्या भावना दुखावणारं आहे. प्रभू रामाबद्दल अपशब्द बोलणार्‍यांवर कडक कारवाई करुन त्याला अटक करण्याची यावेळी मागणी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...