spot_img
राजकारणकाँग्रेसचा विजय तेलंगणात, नशीब फळफळलं महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचं !

काँग्रेसचा विजय तेलंगणात, नशीब फळफळलं महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचं !

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई : देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यात. यात तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली. या विजयात तेलंगणातील नेत्यांसोबत महाराष्ट्रातील एका नेत्याचा मोठा वाटा आहे.

या नेत्याचं नाव आहे माणिराव ठाकरे. माणिकराव ठाकरे यांचं नशीब आता फळफळणार आहे. त्यांना आता मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 5 राज्यांच्या विधासभेच्या निकालात भाजप पक्षाने सरशी मारली.मात्र तेलंगणा राज्यात मात्र काँग्रेसने सत्ता खेचून आणली. या तेलंगणा राज्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्यावर जबाबदारी होती.

त्यांच्या नेतृत्वात तेलंगणा राज्यात निवडणूक लढली गेली. तेलंगणातील जनतेने काँग्रेसच्या रणनितीला चांगला प्रतिसाद दिला आणि सत्ताबदल हा झाला. या विजयानंतर माणिकराव ठाकरे यांना राज्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

पाच राज्यातील विधानसभा निकालानंतर राज्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत महत्त्वपूर्ण बदल होण्याची चिन्हे आहेत. पूर्ण वेळ विभाग निहाय प्रभारी नेमण्याची काँग्रेस कडून शक्यता आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून काम पाहणारे एच के पाटील यांच्या जागेवर नवीन प्रभारी नेमण्यात येणार आहे.

पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशा तऱ्हेने काँग्रेस पक्षाने या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श् वभूमीवर काँग्रेस हायकमांड महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मायक्रो लेव्हल प्लॅनिंग करणार आहे. यामध्ये माणिकराव ठाकरे यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...