spot_img
राजकारणकाँग्रेसचा विजय तेलंगणात, नशीब फळफळलं महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचं !

काँग्रेसचा विजय तेलंगणात, नशीब फळफळलं महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचं !

spot_img

नगर सह्याद्री / मुंबई : देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यात. यात तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली. या विजयात तेलंगणातील नेत्यांसोबत महाराष्ट्रातील एका नेत्याचा मोठा वाटा आहे.

या नेत्याचं नाव आहे माणिराव ठाकरे. माणिकराव ठाकरे यांचं नशीब आता फळफळणार आहे. त्यांना आता मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 5 राज्यांच्या विधासभेच्या निकालात भाजप पक्षाने सरशी मारली.मात्र तेलंगणा राज्यात मात्र काँग्रेसने सत्ता खेचून आणली. या तेलंगणा राज्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांच्यावर जबाबदारी होती.

त्यांच्या नेतृत्वात तेलंगणा राज्यात निवडणूक लढली गेली. तेलंगणातील जनतेने काँग्रेसच्या रणनितीला चांगला प्रतिसाद दिला आणि सत्ताबदल हा झाला. या विजयानंतर माणिकराव ठाकरे यांना राज्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

पाच राज्यातील विधानसभा निकालानंतर राज्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत महत्त्वपूर्ण बदल होण्याची चिन्हे आहेत. पूर्ण वेळ विभाग निहाय प्रभारी नेमण्याची काँग्रेस कडून शक्यता आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी म्हणून काम पाहणारे एच के पाटील यांच्या जागेवर नवीन प्रभारी नेमण्यात येणार आहे.

पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशा तऱ्हेने काँग्रेस पक्षाने या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श् वभूमीवर काँग्रेस हायकमांड महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मायक्रो लेव्हल प्लॅनिंग करणार आहे. यामध्ये माणिकराव ठाकरे यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...