spot_img
ब्रेकिंगमंत्री विखेंचा जनता दरबार ! सर्वच राजकारण्यांना केले 'हे' मोठे आवाहन

मंत्री विखेंचा जनता दरबार ! सर्वच राजकारण्यांना केले ‘हे’ मोठे आवाहन

spot_img

लोणी। नगर सहयाद्री –

जनता दरबाराच्‍या माध्‍यमातून सामान्‍य माणसांची कामे मार्गी लागावीत हाच प्रयत्‍न असतो. गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा मी सुरु ठेवली आहे. असे जनता दरबार सर्वांनीच घेतले तर, शासन व्‍यवस्‍थेवरचा विश्‍वास अधिक दृढ होईल आणि या माध्‍यमातून पारदर्शकताही समोर येण्‍यास मदत होत असल्‍याची भावना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथील आपल्‍या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. जिल्‍ह्यासह संपूर्ण राज्‍यातून मोठ्या संख्‍येने आलेल्‍या नागरीकांचे अर्ज स्विकारुन त्‍यांच्‍या समस्‍या त्‍यांनी जाणून घेतल्‍या. तसेच विविध संघटनांच्‍या शिष्‍टमंडळांशीही चर्चा करुन, त्‍यांच्‍या प्रश्‍नांबाबत शासन स्‍तरावर पाटपुरवा करण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

जनता दरबार ही विखे पाटील यांची संकल्‍पना गेल्‍या अनेक वर्षांपासून सुरु आहे. सत्‍ता असो अथवा नसो नागरीकांच्‍या प्रश्‍नांसाठी महीन्‍यातून एक वेळा मंत्री विखे पाटील जनता दरबारचे आयोजन करुन नागरीकांशी संवाद साधत असतात. सर्वच शासकीय विभागांचे आधिकारीही उपस्थित राहून, नागरीकांच्‍या प्रश्‍नांबाबत तातडीने निर्णय करतात. या जनता दरबारातील या संवादात्‍मक प्रक्रीयेतून नागरीकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मोठी मदत होते.

महसूल मंत्री झाल्‍यानंतर मंत्री विखे पाटील यांनी मागील वर्षभरात १० जनता दरबार आयोजित केले. यापैकी नगर, राहाता, राहुरी या ठिकाणी ३ जनता दरबार झाले. या जनता दरबारच्‍या माध्‍यमातून वर्षभरात १७ हजार ३०४ अर्ज स्विकारण्‍यात आले. यापैकी ९ हजार २७६ अर्जांवर कार्यवाही होऊन त्‍यांची उत्‍तरही वेगवेगळ्या शासकीय विभागाकडून नागरीकांना मिळाले आहेत. उर्वरित ८ हजार २८ अर्ज प्रक्रीयेमध्‍ये असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

प्राप्‍त होणा-या अर्जांवर माझ्या जनसंपर्क कार्यालयातून सातत्‍याने पाठपुरावा होतो. संबधित अर्जदाराला पत्रही दिले जाते. शासकीय कार्यालयांकडे पाठविलेल्‍या अर्जांवर झालेल्‍या कार्यवाहीचा पाठपुरावाही होत असल्‍याने नागरीकांची कामे मार्गी लावण्‍यात मोठी मदत होते. शासकीय कार्यालयांमधून प्रत्‍येक अर्जावर होणा-या कार्यवाहीचा रिपोर्टही दर महिन्‍याला आपण मागवत असल्‍याचे मंत्री विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा, झेडपी निवडणुकांचा ढोल वाजला

फेर प्रभाग रचना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश मुंबई | नगर सह्याद्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला निवडणुकीचा प्लान!, युती होणार नाही, त्या..

Maharashtra politics: चार महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे कोर्टाने आदेश...

अर्बन बँक घोटाळा प्रकरण: पुन्हा महत्वाची अपडेट,आरोपींवर कारवाई करा! मुख्यमंत्र्यांनाकडे कोणी केली मागणी? पहा..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - नगर अर्बन (मल्टीस्टेट) को-ऑप. बँक (अहमदनगर) अहिल्यानगर ही नगर जिल्ह्यातील...

‘अहिल्यानगर मनपा आरोग्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय...