spot_img
महाराष्ट्रऑस्ट्रेलिया-भारत युवा संवादासाठी आ. सत्यजीत तांबेंची निवड

ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवादासाठी आ. सत्यजीत तांबेंची निवड

spot_img

द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी महत्त्वाच व्यासपीठ / आ. तांबेंचा १७ ते २४ ऑगस्ट ऑस्ट्रेलिया अभ्यास दौरा

अहमदनगर / नगर सह्याद्री –
आगामी ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवाद (AIYD) ऑस्ट्रेलिया येथे होणार आहे. दोन्ही देशांतील तरुण नेत्यांच्या विचारचे आदान-प्रदानासाठी हा संवाद आयोजित करण्यात येत असतो. ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवाद ऑस्ट्रेलियात १७ ते २४ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. २०१२ मध्ये स्थापन झालेल्या, AIYD ने दोन्ही देशांमधील या द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांतील तरुण नेत्यांना सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांची निवड करण्यात आली आहे.

आमदार सत्यजीत तांबे हे सातत्याने शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, शहरविकास अशा विविध मुद्दे मांडत असतात. या पूर्वी देखील अमेरिका व इंग्लंडच्या अभ्यास दौऱ्यासाठी आमदार सत्यजीत तांबेंची निवड झाली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियातील तरुणांमध्ये समज, सहयोग आणि स्थायी संबंध वाढवण्यासाठी AIYD हे एक व्यासपीठ महत्त्वाचे आहे. या संवादासाठी आ. तांबेंची निवड हे कौतुकास्पद आहे. प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील नेते दोन्ही देशांसमोरील आव्हाने आणि संधी शोधण्यासाठी एकत्र येतात असतात. आहे. AIYD हे एक व्यासपीठ आहे जे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या भविष्याला आकार देण्यासाठी महत्त्वाचे आहे. नेतृत्व, मुत्सद्दीपणा, नवकल्पना आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर लक्ष केंद्रित करून, हा कार्यक्रम सर्व सहभागींसाठी एक चांगले व्यासपीठ आहे.

ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या युवा संवादात, प्रतिनिधी लोकसंख्याशास्त्रीय बदलांपासून भविष्यातील उद्योगांपर्यंत, शेती आणि AI यासह संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या अडचणी आणि नवीन संधींसाठी दोन्ही देश कसे सहकार्य करू शकतात याचा शोध घेणार आहेत. या संवादामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ, विचारवंत आणि मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल चर्चा, कार्यशाळा आणि संवादात्मक सत्रे असणार आहेत.

ऑस्ट्रेलिया-भारत युवा संवादासाठी माझी निवड झाली आहे. माझ्यासाठी शिकण्याची ही खूप मोठी संधी आहे. या अभ्यास दौऱ्यात कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियाच्या संसदेत जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील शेतीकरी, स्टार्टअप करणाऱ्या आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद करता येणार आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी मदत होणार आहे, असं आ. तांबे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...