spot_img
आरोग्यचीनचा लहान मुलांना बाधित करणारा 'तो' व्हायरस भारतात आलाय? भारत सरकारने केले...

चीनचा लहान मुलांना बाधित करणारा ‘तो’ व्हायरस भारतात आलाय? भारत सरकारने केले स्पष्ट

spot_img

नगर सह्याद्री / दिल्ली
चीनमधील लहान मुलांना लक्ष्य करणाऱ्या रहस्यमयी निमोनिया बॅक्टेरियाची आता अनेक देशांनी दहशत घेतली आहे. कोरोनाच्या धुमाकूळ नंतर आता भारतसह अनेक देशांनी याबाबत सतर्कता बाळगली होती.

दरम्यान मध्यंतरी या बॅक्टरीयाचे भारतात सात रुग्ण सापडले असे वृत्त आले होते. त्यामुळे भारतात खळबळ उडाली होती. परंतु आता भारत सरकारने हे वृत्त फेटाळले आहे. दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेतलेल्या न्युमोनियाच्या रुग्णांचा चीनमधील आजाराशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मदेह एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाचे सात रुग्ण आढळले. एम्सने पीसीआर आणि आयडीएम-एलिसाच्या दोन चाचण्यांद्वारे चीनमध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया या लहान मुलांमध्ये श्वसनाच्या आजारास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाची सात प्रकरणे नोंदविली आहेत.

लॅन्सेट मायक्रोबमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की, संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पीसीआर चाचणीद्वारे एक रुग्ण आढळला, तर उर्वरित सहा प्रकरणे आयजीएम एलिसा चाचणीद्वारे आढळली.

परंतू भारत सरकारने यावर खुलासा करत AIIMS दिल्लीमध्ये बॅक्टेरियाची प्रकरणे आढळल्याचा दावा करणारे मीडिया अहवाल दिशाभूल करणारे आणि चुकीचे आहेत असे म्हटले आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हे समुदाय-अधिग्रहित न्यूमोनियाचे सर्वात सामान्य जिवाणू आहेत.

एम्स दिल्लीतील न्यूमोनिया प्रकरणांचा चीनमधील मुलांमध्ये श्वसन संक्रमणाच्या अलीकडील वाढीशी कोणताही संबंध नाही, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...