spot_img
अहमदनगरगोड साखरेची पारनेरच्या आमदारांना मिरची..? 'यांनी' साधला 'लंके' यांच्यावर निशाणा

गोड साखरेची पारनेरच्या आमदारांना मिरची..? ‘यांनी’ साधला ‘लंके’ यांच्यावर निशाणा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच अहमदनगर लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेत केलेल्या टीकेला भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी प्रतीउत्तर देत निशाणा साधला आहे.

जिल्हाध्यक्ष भालसिंग म्हणाले, ५०० वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून धर्माचे कार्य केले. या कार्याचा आनंदोत्सव साजरा करण्याची प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला संधी मिळावी आणि गरिबातल्या गरिबाला हा आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साखर आणि डाळ वाटून सामान्य नागरिकांना प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता यावे या भावनेतून हा उपक्रम राबविला.

सामाजिक आणि धार्मिक भावनेने केलेल्या कार्यामुळे कुणाच्या बुडाला मिरची लागण्याचे कोणतेही कारण नाही. पाच वर्षे ‘आपला माणूस’ म्हणुन मिडियात आपली प्रतिमा झळकवणाऱ्या लंके यांनी मागील पाच वर्षात काय दिवे लावले, हे जनतेला माहित आहे. गेल्या ५० वर्षात विखे पाटील परिवाराने राजकारणातील सुसंस्कृतपणा काय असतो? याचे उत्तम उदारण समाजापुढे ठेवले आहे.

त्यांनी अथवा त्यांच्या कोणत्याही माणसाने गोळ्या झाडून कुणाला संपवण्याची धमकी कुणाला दिली नाही. पारनेरच्या आमदारांनी लोकांच्या पाणीप्रश्नाबाबात विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले याची माहिती जनतेला द्यावी. गरिबीचे भांडवल करून माध्यमांत आपली प्रतिमा उजळ करणाऱ्याना विकास काय कळणार? असा खोचक सवाल दिलीप भालसिंग यांनी विचारला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी की लुटण्यासाठी?; आमदार जगताप यांचा सवाल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - शहरातील कोतवाली व तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोऱ्या दरोडे महिलांच्या...

शहर विकासाच्या आड मनपाच्या टीपीची किड!

पालकमंत्री विखे पाटलांनी स्वतंत्र बैठक घेण्याची गरज | आ. जगताप यांच्या विरोधात जनमत तयार...

सत्ताधारी पुरोगामी मंडळाला मोठा धक्का! परिवर्तन मंडळाचा २१ जागांवर विजय..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन मंडळाने २१ जागांवर मुसंडी...

कार्यकर्त्यांची फौज अन्‌‍ जीवाला जीव देणाऱ्या निष्ठावंतांचं केडर जपणारे ‘अरुणकाका’

सारिपाट / शिवाजी शिर्के नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेल्या अरुणकाका जगताप यांनी पुढे जाऊन काही...