spot_img
अहमदनगरगोड साखरेची पारनेरच्या आमदारांना मिरची..? 'यांनी' साधला 'लंके' यांच्यावर निशाणा

गोड साखरेची पारनेरच्या आमदारांना मिरची..? ‘यांनी’ साधला ‘लंके’ यांच्यावर निशाणा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच अहमदनगर लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेत केलेल्या टीकेला भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी प्रतीउत्तर देत निशाणा साधला आहे.

जिल्हाध्यक्ष भालसिंग म्हणाले, ५०० वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून धर्माचे कार्य केले. या कार्याचा आनंदोत्सव साजरा करण्याची प्रत्येक हिंदुत्ववादी नागरिकाला संधी मिळावी आणि गरिबातल्या गरिबाला हा आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साखर आणि डाळ वाटून सामान्य नागरिकांना प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होता यावे या भावनेतून हा उपक्रम राबविला.

सामाजिक आणि धार्मिक भावनेने केलेल्या कार्यामुळे कुणाच्या बुडाला मिरची लागण्याचे कोणतेही कारण नाही. पाच वर्षे ‘आपला माणूस’ म्हणुन मिडियात आपली प्रतिमा झळकवणाऱ्या लंके यांनी मागील पाच वर्षात काय दिवे लावले, हे जनतेला माहित आहे. गेल्या ५० वर्षात विखे पाटील परिवाराने राजकारणातील सुसंस्कृतपणा काय असतो? याचे उत्तम उदारण समाजापुढे ठेवले आहे.

त्यांनी अथवा त्यांच्या कोणत्याही माणसाने गोळ्या झाडून कुणाला संपवण्याची धमकी कुणाला दिली नाही. पारनेरच्या आमदारांनी लोकांच्या पाणीप्रश्नाबाबात विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले याची माहिती जनतेला द्यावी. गरिबीचे भांडवल करून माध्यमांत आपली प्रतिमा उजळ करणाऱ्याना विकास काय कळणार? असा खोचक सवाल दिलीप भालसिंग यांनी विचारला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...