spot_img
अहमदनगरसावधान! नागरिकांनो बाहेर पडण्यापूर्वी हवामान खात्याचा अंदाज वाचा

सावधान! नागरिकांनो बाहेर पडण्यापूर्वी हवामान खात्याचा अंदाज वाचा

spot_img

Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. सोमवारपासून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातीलअनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. विशेषतः मुंबई शहरात अंतर्गत भागांमध्ये प्रचंड उकाडा जाणवू लागला असून नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली तर सांताक्रूझ येथे तापमान ३६.८ अंशांपर्यंत पोहोचले. उपनगरांमध्ये बोरिवली, भांडुप, पवई आणि मुलुंड येथे तापमान अनुक्रमे ३८.८°C, ३८.३°C, ३८°C आणि ३७.७°C इतके नोंदवण्यात आले.

सोलापूरात सोमवारी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान ठरले. सोलापूर हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सात दिवसांपूर्वीच सोलापूरचे तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते. धाराशिव जिल्ह्यात मात्र उष्णतेची लाट पुढील तीन दिवस म्हणजे १७ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, जिल्ह्याच्या काही भागांत तापमान ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यासोबतच काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तज्ज्ञांच्या मते, मुंबई शहराची भौगोलिक रचना ही तापमानातील तफावत घडवून आणणारी ठरते. कुलाबा, नरिमन पॉइंटसारख्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये समुद्राच्या वाऱ्यांमुळे तापमान काहीसे नियंत्रणात राहते. मात्र, पूर्वेकडील उपनगरांमध्ये सिमेंटच्या इमारती आणि गर्दीमुळे उष्णता अडकते, त्यामुळे तापमान झपाट्याने वाढते. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा जोर वाढत असून नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...