spot_img
अहमदनगरसावधान! नागरिकांनो बाहेर पडण्यापूर्वी हवामान खात्याचा अंदाज वाचा

सावधान! नागरिकांनो बाहेर पडण्यापूर्वी हवामान खात्याचा अंदाज वाचा

spot_img

Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. सोमवारपासून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातीलअनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. विशेषतः मुंबई शहरात अंतर्गत भागांमध्ये प्रचंड उकाडा जाणवू लागला असून नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली तर सांताक्रूझ येथे तापमान ३६.८ अंशांपर्यंत पोहोचले. उपनगरांमध्ये बोरिवली, भांडुप, पवई आणि मुलुंड येथे तापमान अनुक्रमे ३८.८°C, ३८.३°C, ३८°C आणि ३७.७°C इतके नोंदवण्यात आले.

सोलापूरात सोमवारी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमान ठरले. सोलापूर हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सात दिवसांपूर्वीच सोलापूरचे तापमान ४२ अंशांवर पोहोचले होते. धाराशिव जिल्ह्यात मात्र उष्णतेची लाट पुढील तीन दिवस म्हणजे १७ एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, जिल्ह्याच्या काही भागांत तापमान ४४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यासोबतच काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तज्ज्ञांच्या मते, मुंबई शहराची भौगोलिक रचना ही तापमानातील तफावत घडवून आणणारी ठरते. कुलाबा, नरिमन पॉइंटसारख्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये समुद्राच्या वाऱ्यांमुळे तापमान काहीसे नियंत्रणात राहते. मात्र, पूर्वेकडील उपनगरांमध्ये सिमेंटच्या इमारती आणि गर्दीमुळे उष्णता अडकते, त्यामुळे तापमान झपाट्याने वाढते. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा जोर वाढत असून नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...