spot_img
अहमदनगरब्रेकिंग : जायकवाडीत पाणी सोडण्याच्या प्रक्रियेस सुरवात ! अनेक ठिकाणी जमावबंदी, 'असे'...

ब्रेकिंग : जायकवाडीत पाणी सोडण्याच्या प्रक्रियेस सुरवात ! अनेक ठिकाणी जमावबंदी, ‘असे’ केलेय नियोजन

spot_img

अहमदनगर / नगरसह्याद्री : जायकवाडीला पाणी सोडण्याचा वाद नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात सुरु आहे. पाणी सोडू नये यासाठी दोन्ही जिल्ह्यातून विरोध होत आहे. परंतु असे असताना आता एक महत्वाची बातमी आली आहे. पैठण धरणामध्ये भंडारदरा व निळवंडे धरणातून प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यादृष्टीने तयारी देखील सुरु झाली आहे.

जमावबंदी
ही प्रक्रिया सुरु करण्यासाठी प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत. प्रवरानदीवर येणाऱ्या रामपूर, केसापूर, मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, खानापूर व कमलापूर आदी कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदीचे आदेश जारी केलेत. हे 4 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश समर आहेत. श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी किरण सावंत पाटील यांनी हे आदेश दिलेले आहेत.

अनुचित कृतींवर बसणार चाप
हे पाणी सोडल्यानंतर लाभक्षेत्रातील परिसरांत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विविध नियोजन केले आहे. तसेच पैठण धरणामध्ये सोडलेले पाणी सुरळीतपणे जाण्यासाठी फळया (बर्गे) काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.

त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवाह कालावधीत लाभधारकांकडून अनिधकृत पाणी उपसा होऊ शकतो, तेथे नेमलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्‍यांना दमदाटी, मारहाण असले अनुचित प्रकार घडण्याचेही शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टींना चाप बसावा यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लावले आहेत.

या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे व या परिसरात प्रवाह कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तीस एकत्र येणे असे चालणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी निर्बंध असणार असल्याचे आदेशात सांगितले गेले आहे. त्यामुळे आता या परिसर अनुचित प्रकार होणार नाहीत याची सर्वतोपरी काळजी घेतली गेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...