spot_img
अहमदनगरब्रेकिंग: नगर-कल्याण महामार्गावर अपघात!! चिमुकलीचा मृत्यू तर तीन गंभीर

ब्रेकिंग: नगर-कल्याण महामार्गावर अपघात!! चिमुकलीचा मृत्यू तर तीन गंभीर

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री-
नगर कल्याण महामार्गावर कर्जुले हर्याच्या कोकाटे वस्ती जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोची झाडाला धडक बसल्याने ८ वर्षाची मुलगी जागीच ठार झाली असून तीन जण जखमी झाले आहे. शनिवार दि १३ एप्रिल रोजी पहाटे‌ ५.३० ही घटना घडली असून या घटनेत देविका अनिल फुलमाळी ( वय ८ वर्षं, रा. निरगुडी ता. पाटोदा ) ही जागीच ठार झाली आहे. तर चालक अनिल रामा फुलमाळी अनिता रामा फुलमाळी व रुद्राक्ष अनिल फुलमाळी सर्व ( रा. निरगुडी ता. पाटोदा ) हे तिघेजण जखमी झाले असून त्याच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे.

अधिक माहिती अशी: फुलमाळी कुटुंबीय आपल्या मालकीच्या चार चाकी वाहनाने ( क्रमांक एम. एच. १२ केपी ८२९४ ) ने खोपोली येथे दोन दिवसापूर्वी यात्रा उत्सवासाठी खेळणीसह इतर माल विक्रीसाठी गेले होते.

शनिवारी दि. १३ एप्रिल रोजी आपल्या गावाकडे परतत असताना नगर कल्याण महामार्गावरील कर्जुले हर्या येथील कोकाटे वस्ती शिवारातील शनिवारी पहाटे ५.३० च्या दरम्यान झोपेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याचे वाहन झाडाला आदळले. अपघातामध्ये चिमुकली देविका जागीच ठार झाली असून तिघे जण जखमी झाले आहे.

गेल्या चार दिवसाच्या कालावधीत टाकळी ढोकेश्वर ते कर्जुले हर्या हद्दीपर्यंत दोन मोठे अपघात झाले असून या दोन्ही घटनेत दोन मयत तर सात जण जखमी झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रितम मोढवे पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र खेमनर आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....