spot_img
अहमदनगरAhmednagar News: नगर मनमाड महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको! काय केली मागणी पहाच..

Ahmednagar News: नगर मनमाड महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको! काय केली मागणी पहाच..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला आवर्तन सोडावे या मागणीसाठी शुक्रवार दि. १७ मे रोजी नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पाण्याअभावी पिके करपण्याची भिती व्यक्त केली. शेतीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांनी राहुरी येथे एकत्र येत नगर मनमाड महामार्ग अडवला. यावेळी आंदोलकांनी निवडणुका संपल्या त्यामुळे नेते मंडळी आता गावांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा दावा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले.

या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी सरकारवर रोष व्यक्त केला. जनावरांना पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतक-यांना सरकारने वार्‍यावर सोडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ! ‘बड्या’ नेत्याचे अपहरण अन् मारहाण, VIDEO आला समोर..

श्रीरामपूर। नगर सहयाद्री:- अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. अपहरण करतानाचे...

निवडणूकीचा प्रचारात राडा! काँग्रेस नेत्याचा भयंकर प्रताप; भाजपचा प्रचार करणाऱ्या…

Political News: नागपूरमध्ये कळमेश्वर निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांना आरिफ शेख...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींवर महालक्ष्मीची कृपा होणार, दुप्पट नफा मिळणार ! जाणून घ्या तुमचा आजचा दिवस!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. थोड्या...

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, शहरात खळबळ

Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला...