spot_img
अहमदनगरAhmednagar News: नगर मनमाड महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको! काय केली मागणी पहाच..

Ahmednagar News: नगर मनमाड महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको! काय केली मागणी पहाच..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला आवर्तन सोडावे या मागणीसाठी शुक्रवार दि. १७ मे रोजी नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पाण्याअभावी पिके करपण्याची भिती व्यक्त केली. शेतीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांनी राहुरी येथे एकत्र येत नगर मनमाड महामार्ग अडवला. यावेळी आंदोलकांनी निवडणुका संपल्या त्यामुळे नेते मंडळी आता गावांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा दावा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले.

या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी सरकारवर रोष व्यक्त केला. जनावरांना पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतक-यांना सरकारने वार्‍यावर सोडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुंबई हायअलर्टवर! गणपती विसर्जनाआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी ; ३४ मानवी बॉम्ब अन आरडीएक्स…

मुंबई / नगर सह्याद्री - मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात...

‌’अजित पवार चोरांचे सरदार‌’; कोणी केला आरोप?, वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सहयाद्री: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका पोलीस अधिकारी महिलेला फोनवरून तंबी...

शहरातील वाहतुकीत बदल, जड वाहनांना दिवसा प्रवेश बंद, वाचा पर्यायी मार्ग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील वाढत्या जड वाहन वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण...

सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 18 लाखांला फसवले; वाचा, अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रेल्वे खात्यात मुलीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत सेवानिवृत्त पशुसंवर्धन...