spot_img
ब्रेकिंगबाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावर मोठी अपडेट; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया...

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावर मोठी अपडेट; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अजित गटात प्रवेश केलेल्या बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील बांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसबाहेर ही घटना घडली आहे. या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर एक आरोपी आता फरार आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची पथके रवाना केली आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या गोळीबार झालेली दुर्देवी घटना आहे. पोलिसांना प्रकरणात कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गँगवार डोकं वर काढता कामा नये. तीन आरोंमधील दोघांना पकडले असून एक आरोपी हरियाणा आणि एक उत्तर प्रदेशमधील आहे. तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बाबा सिद्दिकी यांना गोळीबारानंतर लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार हे लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत.

बाबा सिद्दिकी यांची सुपारी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत होती. तिन्ही आरोपी पुण्यातून आले होते, मात्र यांना कोणी बोलावलं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामधील एका आरोपीचे नाव शिवा असं असून य हत्येमागे एक मोठा गँगस्टर असल्याचं माहिती समोर येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...

आ. दाते यांनी घेतली शेतकऱ्यांच्या मागणीची दखल! ‘या’ योजनेचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार..

पारनेर । नगर सहयाद्री:- खडकवाडी गावातील शेतकऱ्यांनी पाझर तलावातील गाळ काढण्याची मागणी अनेक दिवसांपासून...

‘जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त होणार’; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती..

पुणे । नगर सहयाद्री:- राज्यातील जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी समिती...