spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! मनोज जरांगे पाटील फिरले माघारी! नेमकं कारण काय?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील फिरले माघारी! नेमकं कारण काय?

spot_img

जालना। नगर सह्याद्री-
प्रशासनाने अंबड तालुक्यात थेट संचारबंदीचे आदेश काढले असून त्यांच्या कट्टर समर्थकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील एकाही मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून पुन्हा आंतरवाली सराटीच्या दिशेने माघारी फिरले आहे.

रविवार दि, २५ रोजी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्यांच्यामुळे अनेकांनी भाजप सोडले. राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीतर देवेंद्र फडणवीस चालवत आहे. अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याने फडणवीसांचा आपल्यावर राग आहे. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर जाणार असल्याचे देखील म्हटले होते.

दरम्यान मुंबईतील सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागेल, एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आता आंतरवालीत जाऊन चर्चा करू त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे म्हणत माघारी फिरले असून सर्व मराठा बांधवानी संचारबंदी उठल्यावर आंतरवालीत यावे असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.

अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार आहे. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्रित येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

मनोज जरांगे यांचे कट्टर समर्थक ताब्यात
मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर जाणार असा इशाराही दिला होता. त्यानंतर सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक पोलीस पथक जालन्यात धडकले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक श्रीराम कुरणकर, शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे यांना ताब्यात घेतले आहे.

अंबड तालुक्यात एसटी बस पेटवली
मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहे. पोलिसांनी अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या परिसरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...

कांद्याची महाबँक: उल्लू बनविणारा प्रयोग!अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना गंडवले

अभिनव बँक, हिंदुस्थान अ‍ॅग्रो अन् शार्क माशाच्या नावाखाली भारत ढोकणेने कोट्यवधी कमावले अन् गोरगरीबांना...

बागुल पंडुगू सण तुम्हा माहित आहे का? नगरमध्ये केला जातो उत्साहात साजरा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरात बागुल पंडुगू सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तोफखाना...