spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! मनोज जरांगे पाटील फिरले माघारी! नेमकं कारण काय?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील फिरले माघारी! नेमकं कारण काय?

spot_img

जालना। नगर सह्याद्री-
प्रशासनाने अंबड तालुक्यात थेट संचारबंदीचे आदेश काढले असून त्यांच्या कट्टर समर्थकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील एकाही मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून पुन्हा आंतरवाली सराटीच्या दिशेने माघारी फिरले आहे.

रविवार दि, २५ रोजी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्यांच्यामुळे अनेकांनी भाजप सोडले. राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीतर देवेंद्र फडणवीस चालवत आहे. अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याने फडणवीसांचा आपल्यावर राग आहे. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर जाणार असल्याचे देखील म्हटले होते.

दरम्यान मुंबईतील सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागेल, एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आता आंतरवालीत जाऊन चर्चा करू त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे म्हणत माघारी फिरले असून सर्व मराठा बांधवानी संचारबंदी उठल्यावर आंतरवालीत यावे असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.

अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार आहे. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्रित येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

मनोज जरांगे यांचे कट्टर समर्थक ताब्यात
मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर जाणार असा इशाराही दिला होता. त्यानंतर सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक पोलीस पथक जालन्यात धडकले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक श्रीराम कुरणकर, शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे यांना ताब्यात घेतले आहे.

अंबड तालुक्यात एसटी बस पेटवली
मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहे. पोलिसांनी अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या परिसरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...