spot_img
महाराष्ट्रMaratha Reservation : मोठी बातमी ! मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची मागणी फेटाळली,...

Maratha Reservation : मोठी बातमी ! मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची मागणी फेटाळली, नेमकं काय घडलंय ? पहा..

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंबंधी आंदोलन सुरु असतानाच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलेली मागणी फेटाळली आहे.

‘कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही’ असं मुख्यमंत्री (Chief Minister Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले आहे. अशी माहिती शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी दिलीये. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बैठक संपल्यानंतर जयंत पाटील बाहेर आले. त्यावेळी त्यांना बैठकीत काय चर्चा झाली? काय ठरलं? असं विचारण्यात आलं. “काहीही घडलेलं नाही, आहे तीच परिस्थिती आहे. फक्त शांतता राखा, उपोषण मागे घ्या हा ठराव एकमुखाने या सर्वपक्षीय बैठकीत झाला” असं जयंत पाटील म्हणाले. कुणबीमधून मराठा समाजाला ससकट आरक्षण देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याच जयंत पाटील म्हणाले. आरक्षणासाठी आयोग काम करतोय, असं जयंत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय आहे म्हणणं !
मराठा समाजाने थोडा संयम बाळगावा. सरकारला थोडा वेळ द्या, असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, सहकार्य करावे. “आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला सहकार्य करा, सकल मराठा समाजाने सहकार्य करावे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Parner: खासदार विखे शेतकऱ्यांच्या बांधावर! म्हणाले, शेतकऱ्यांना..

पारनेर। नगर सह्याद्री- तालुक्यातील महसूल व कृषी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना पिकांचे पंचनामे करताना कोणत्याही अडचणी येऊ...

Ahmednagar: सैनिकाला मारहाण..; नगरच्या ‘या’ भागात ‘धक्कादायक’ प्रकार

अहमदनगर | नगर सह्याद्री- सैनिकाच्या पत्नी विषयी समाजात वाईट बोलून त्यांची बदनामी केली. याबाबत जाब...

‘महसूलमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातुन तीन कोटी निधी’

सागर मैड यांची पत्रकार परिषदेत माहिती सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील सुपा गावात येत्या काळात...

…म्हणून प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना महत्व, जाणून घ्या सविस्तर

नगर सहयाद्री टीम- प्राचीन काळात मातीच्या भांड्यांना फार महत्व दिले जात होते. बाजारात चककणारी व...