spot_img
ब्रेकिंग'खा.विखे यांच्या माध्यमातून विकासासाठी मोठा निधी'

‘खा.विखे यांच्या माध्यमातून विकासासाठी मोठा निधी’

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत संकल्पना पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ सुजय विखे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी वस्तीवर तसेच ग्रामीण भागात मोठा निधी उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे माजी सभापती काशिनाथ दाते यांनी केले.

अळकुटी येथे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून ३३ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, युवा नेते सचिन वराळ पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, सरपंच चित्राताई वराळ, राहुल गाडगे, माजी सरपंच भाऊसाहेब डेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती दाते सर बोलत होते.

राहुल शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी खासदारांच्या वतीने महिला बचत गटांना वेगवेगळ्या फूड प्रोसेसिंग साहित्याचे वितरण करण्यात येत असुन प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी बचत गटांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगीतले. यावेळी सचिन वराळ पाटील म्हणाले, गेली पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम करताना जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ देउन विखे पाटील यांनी विकासकामांची गंगोत्री देण्याचे मोठे काम केले आहे म्हणून हा जिल्हा परिषद गट विकास कामांमध्ये स्वयंपुर्ण झाला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्याचा विकास करताना जिल्हा विकासमय केला असून पारनेर नगर विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनाच विक्रमी मताधिक्याने विजयी करील असा विश्वास वराळ पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी खरेदी विक्री चे संचालक संग्राम पावडे, उपसरपंच शरद घोलप, माजी उपसरपंच आरिफ पटेल, सदस्य लता घोलप, माजी सरपंच निवृत्ती चौधरी, सदस्य रविंद्र गायकवाड, संचालक डॉ. बाबुराव म्हस्के, माजी सरपंच अशोक शेळके, बाबाजी येवले, उपसरपंच बाळासाहेब धोत्रे, भाजपचे सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष विलासराव हारदे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार व मान्यवर उपस्थिती होते. याप्रसंगी सोनाली सालके यांनी महिला सबलीकरण करण्यासंदर्भात आपली मते मांडली. किसन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. उत्तम घोलप यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब धोत्रे यांनी आभार मानले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...