spot_img
ब्रेकिंगसावधान! पुढील पाच दिवस उष्णतेची लाट, हवामान खात्याचा नवा अंदाज काय? पहा..

सावधान! पुढील पाच दिवस उष्णतेची लाट, हवामान खात्याचा नवा अंदाज काय? पहा..

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
पुढील पाच दिवस शुक्रवार १७ मे ते मंगळवार २१ मे दरम्यान राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या काही भागात उष्ण वारे वाहण्याची शयता आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. सध्या देशातील अनेक भाग उष्णतेने त्रस्त आहेत. राजधानी दिल्लीत गुरुवारी या हंगामातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली.

गुरुवारी दिल्लीत कमाल तापमान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंश सेल्सिअस जास्त आहे. शुक्रवारी देशातील अनेक भागात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. तर शनिवारी कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते असे देखील भारतीय हवामान विभागाकडून दिलेल्या बुलेटीनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१६) देशात अनेक ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअस ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत होते. विशेषतः राजस्थानच्या बहुतांश भागात, दक्षिण हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तापमान ४३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. हे सामान्य तापमानापेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअस जास्त आहे, असे देखील हवामान खात्याने म्हटले आहे.

पुढील पाच दिवस १७ मे ते २१ मे दरम्यान राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या काही भागात, १८ मे ते २१ मेमध्ये उत्तर मध्य प्रदेशात, १८ ते २१ मे दरम्यान पश्चिम राजस्थान, पंजाब आणि हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात प्राणघातक उष्णतेची लाट येण्याची शयता आहे.

तर उप-हिमालयीन भागात आणि पश्चिम बंगालमध्ये १७ मे रोजी आर्द्रता आणि उष्णतेमुळे लोक त्रस्त होतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तर तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकलच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शयता आहे. तसेच आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारी कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार पावसाची शयता व्यक्त केली आहे.

या जिल्ह्यात पावसाची शयता
जळगाव, नाशिकमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शयता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वार्‍यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये हलया ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शयता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (५०-६० किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शयता आहे. तर उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शयता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...