spot_img
राजकारणBaba Balaknath : "गँगस्टर, गुंडा शोधूनही सापडणार नाही"; योगी आदित्यनाथांमागे आता बाबा...

Baba Balaknath : “गँगस्टर, गुंडा शोधूनही सापडणार नाही”; योगी आदित्यनाथांमागे आता बाबा बालकनाथ? पहा..

spot_img

नगर सहयाद्री / राजस्थान
Baba Balaknath : आता नुकत्याच पाच राज्याच्या निवडणूक पार पडल्या. त्यात तीन राज्यात भाजप सत्तेत आली. या विजयानंतर चहरचा होऊ लागली आहे ती म्हणजे बाबा बालकनाथ यांची. राजस्थामध्ये हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील असे म्हटले जात आहे.

आता नुकताच त्यांनी गँगस्टर, गुंड आता शोधूनही सापडणार नाहीत आणि जनतेला न्याय मिळेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता योगी आदित्यनाथांमागे आता बाबा बालकनाथ गुंडांमध्ये दहशत निर्माण करतील असे म्हटले जात आहे. तिजारा विधानसभा मतदारसंघातून बाबा बालकनाथ विजयी झाले आहेत.

बाबा बालकनाथ यांना कन्हैया लालच्या हत्येबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही या प्रकरणात पूर्ण न्यायपर्यंत पोहोचू. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात महिलांवर अत्याचार झाले. गँगस्टर, गुंड आता शोधूनही सापडणार नाहीत आणि जनतेला न्याय मिळेल,

तुम्ही मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर बाबा बालकनाथ म्हणाले की, हा माझा विषय नाही. निवडणूक जिंकणं हे माझं काम होतं आणि आता पुढे सेवा करेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान राजस्थानमध्ये भाजपचा विजय झाला त्यामागे त्यांनी नेमके काय कारण आहे असे विचारले असता ते म्हणाले की, गेहलोत यांच्याकडे कोणतीही योजना नव्हती. फक्त खोट्या गोष्टींची पेटी होती, प्रत्यक्षात काहीही नव्हतं असं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...