spot_img
अहमदनगरनीलक्रांती चौकात दोन गटात राडा! कारण काय?

नीलक्रांती चौकात दोन गटात राडा! कारण काय?

spot_img

दोन गट भिडले | फिर्यादी दाखल | चार जखमी, ६१ जणांवर गुन्हे

अहमदनगर | नगर सह्याद्री
दिल्लीगेट येथील नीलक्रांती चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेल्या दोन दिवसांपासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. शुक्रवारी (दि.१२) रात्री या चौकात सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान गाणे लावण्यावरून मोठा वाद झाला. दोन गट आपसात भिडले. दांडके, कोयत्याने परस्परांवर वार करण्यात आले. यावेळी तोडफोड करून खुर्च्यांची फेकाफेकी करण्यात आली. यात चार जण जखमी झाले आहेत.

याबाबत एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार रविराज अजय साळवे याच्यासह ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसर्‍या गटाचे राहुल अजय साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय पठारे याच्यासह २४ जणांवर गुन्हे झाले आहेत.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्यासह कोतवाली व तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, आनंद कोकरे घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. या घटनेप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल अजय साळवे (रा. बालिकाश्रम रोड, नीलक्रांती चौक, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि. १२ रोजी रात्री नऊ ते साडेनऊ दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम गितांचा कार्यक्रम सुरू असताना सदर कार्यक्रमात सनी कांबळे, अंकुश कांबळे, सागर रोकडे, गौरव गायकवाड, अमोल गायकवाड, प्रतीक बारस्कर, अभी लोणारे, आकाश कांबळे यांच्या सांगण्यावरून विजय पठारे, राहुल झेंडे, रोहित कुचेकर, करण पाचारणे, सनी राजेंद्र पाथरे, सुमीत विजय शिंदे, अव्दित दिनेश शिंदे, राज चावरे (सर्व रा. सिध्दार्थनगर, नगर) हे त्यांच्यासोबत आणखी काही सात ते आठ इसम आले. कार्यक्रमाच्या स्टेजवर हातात पाईप, लाकडी दांडके व चाकु घेऊन येऊन आमचे लहुजींचे गाणे लावा, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून विजय पठारे याने त्याच्या हातातील चाकुने मला जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोयात चाकु मारून मला तसेच एकनाथ गायकवाड, प्रतीक शिंदे यांना जखमी केले.

तसेच इतरांनी दहशत निर्माण करून शिवीगाळ करत दमदाटी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. विजय राजु पठारे (रा. सिध्दार्थनगर, नगर) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले की, दि. १२ रोजी रात्री नऊच्या सुमारास नीलक्रांती चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील स्टेजवर गेलो असता, तेथे महापुरूषांचे फोटो खुर्चीवर पुजनाकरीता ठेवलेले होते.

त्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा फोटो न दिसल्याने, त्यांचा फोटो का ठेवला नाही, अशी मी अजय साळवे यांना विचारणा केली असता, त्याचा राग आल्याने अजय साळवे याचा मुलगा याने मला स्टेजवरून खाली ओढून त्याच्या हातातील तलवारीच्या उलट्या बाजुने माझ्या खांद्यावर मारले तसेच गौरव साळवे याने मला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील चॉपरने माझ्या डोयावर उजव्या बाजुला मारले. त्यात माझ्या डोयाला दुखापत झाली आहे. तसेच येथे उपस्थित असलेले अजय साळवे, भप्या भोसले, बुग्गा उर्फ रूपेश तुळशीराम गायकवाड व इतर सात ते आठ अनोळखी (सर्व रा. नीलक्रांती चौक, नगर) यांनी मला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रस्थापितांनी धसका घेतलेले शिवाजीराव!

सारीपाट / शिवाजी शिर्के वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक...

कोल्हेवाडीत थरार! तरुणाने पेटवली कार; भांडण सोडवणे पडले महागात

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर...

शहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना...