spot_img
ब्रेकिंगमाजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? मंत्री विखे पाटलांचा निशाणा

माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? मंत्री विखे पाटलांचा निशाणा

spot_img

राहाता । नगर सहयाद्री-
विरोधकांचा केवळ टीका करणे आणि राजकारण करणे हाच हेतू आहे. माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? चांगले काम यांनी कोणते केले हे जनतेला त्यांनी सांगावे. अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकरूखे, रांजणगाव खुर्द, बाकडी आणि जळगाव येथे बुब कमिटी आणि कार्यकर्त्यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुकुंदराव सदाफळ, ओंकार भवर, देवेंद्र भवर, जालिंदर गाढवे, भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष शोभाताई घोरपडे, सुवर्णा तेलोरे, राजेंद्र लहारे, कविता लहारे, संपतराव शेळके, भाऊसाहेब शेळके, रंजना लहारे, रोहिणी आहेर आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, पंतप्रधानांच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. देशातील ८० टक्के लोकांना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकरी हिताच्या अनेक योजना केंद्र सरकारने सुरू केल्या. राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून एक रुपयात पीकविमा योजना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रूपये अनुदान दिले आहे.

जिल्ह्यात नव्याने निर्माण होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतून मोठी रोजगार निर्मिती होणार असून खंडकरी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सरकारच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. विरोधकांचा केवळ टीका करणे आणि राजकारण करणे हाच हेतू आहे. माजी महसूल मंत्र्यांनी खंडकऱ्याचे कोणते प्रश्न सोडविले? चांगले काम यांनी कोणते केले हे जनतेला त्यांनी सांगावे. अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...