spot_img
ब्रेकिंगRain update: पुन्हा अवकळीचे संकट!! 'या' भागात थंडी तर 'त्या' जिल्ह्यांना पावसाचा...

Rain update: पुन्हा अवकळीचे संकट!! ‘या’ भागात थंडी तर ‘त्या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

spot_img

नवी दिल्ली-
देशाच्या काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. सध्या संपूर्ण उत्तर भारतात प्रचंड थंडी आहे. दाट धुयामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, चंदीगड आणि मध्य प्रदेशात पुढील पाच दिवस दाट धुके पडण्याची शयता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत दिल्ली-एनसीआरमध्ये दाट ते दाट धुके पडण्याची शयता आहे. यासोबतच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २३) दिल्लीत यलो अलर्ट जारी केला आहे. दिवसा आकाश निरभ्र राहण्याची शयता आहे.

धुयामुळे रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या २४ तासांत या भागात किमान तापमान ३ ते ७ अंश सेल्सिअस दरम्यान होते. दतिया (पश्चिम मध्य प्रदेश) येथे सर्वात कमी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

उत्तरेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर येथे कडायाची थंडी आहे. मराठवाडा, विदर्भातील तापमानात घट झाली आहे.

पुढचे काही दिवस राज्याला थंडीपासून दिलासा मिळणार नाही, अशी शयता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात काही भागांत २३, २४ तारखेला तुरळक पावसाची शयता वर्तवली आहे. पूर्व विदर्भात किरकोळ पावसाची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...