spot_img
ब्रेकिंगभाजपचं सरकार, त्यामुळे अण्णा हजारे यांना अजार..?, म्हणून ते आराम करत आहेत;...

भाजपचं सरकार, त्यामुळे अण्णा हजारे यांना अजार..?, म्हणून ते आराम करत आहेत; रोहित पवारांनी साधला निशाणा

spot_img

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे भाजपचे सरकार आल्यानंतर आजारी पडले असतील, त्यामुळे ते आंदोलन करत नाही अशा शब्दात कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर साधला आहे.

आता पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने 200 पेक्षा अधिक जागा जिंकल्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केलीये. फेरमतमोजणीची मागणीही काही उमेदवारांनी केली असून हळूहळू या निकालाला विरोध वाढताना दिसत आहे. अशातच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 95 वषय बाबा आढाव यांनी यासंदर्भातचआंदोलन सुरू केलं आहे. याचाच धागा पकडत आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला.

पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले, सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या अशा जागा आल्या आहेत की अजित पवार यांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर एकनाथ शिंदे यांची चांदी आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला अडचणी करण्याचा प्रयत्न केला तर अजित पवारांची चांदी आहे अशी सध्याची स्थिती आहे.

महायुतीचं सरकार आल्यानंतर आता पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करणार असल्याची चर्चा आहे. बाबा आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपचे सरकार आल्यानं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाहीत. ते आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...