spot_img
राजकारणमराठा आरक्षणात अमित शहा लक्ष घालणार ! फडणवीस, बावनकुळेंना दिल्लीत बोलवलं

मराठा आरक्षणात अमित शहा लक्ष घालणार ! फडणवीस, बावनकुळेंना दिल्लीत बोलवलं

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : राज्यात मराठा आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील आता धसका घेतला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांसह विरोधातील आमदारांनी देखील आता आंदोलनास पाठिंबा देण्यास सुरवात केली आहे.

भाजप खासदारांनी देखील राजीनामे दिले आहेत. राज्यातील मंत्रिमंडळ बैठक, राजकीय चर्चा यांचा काहीच परिणाम होत नसल्याने आता दिल्लीत केंद्रीय पातळीवर याबाबत हालचाली सुरु झाल्याचे वृत्त आहे.आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ऍक्टिव्ह होण्याची शक्यता वर्तवली जातेय. अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीत आज बोलवलंय.

ते दोघेही दिल्लीतील निवासस्थानी दुपारी ३.३० वाजता पोहोचणार आहेत. यांच्यामध्ये आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होईल अशी माहिती समोर येत आहे. मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली होती.

त्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीला बोलावलं. आता मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना काही सूचना देतात का? की ते स्वतः यात काही निर्णय घेतील एके लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...