spot_img
राजकारणअमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांची मोठी खेळी, 'या' मोठ्या अभिनेत्यास उभे करणार

अमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांची मोठी खेळी, ‘या’ मोठ्या अभिनेत्यास उभे करणार

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आगामी लोकसभेचे उमेदवार कोण असतील याची चर्चा सध्या चांगली रंगू लागली आहे. सध्या शिरूर मतदार संघाकडे अनेकांचे लक्ष आहे. याचे कारणही असेच आहे. येथे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार यांनी शड्डू ठोकले असून ते तेथे कोणता उमेदवार उभे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता अभिनेते नाना पाटेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. शिरुर मतदारसंघातून नाना पाटेकर यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही महत्वाचं विधान केलं आहे. नाना पाटेकर यांच्याबद्दल त्यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.

शिरूर मतदार संघातून अजित पवार गटाकडून अभिनेते नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता सुरू आहे. त्यासंदर्भातील अनेक चर्चाही सुरू आहेत. यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘नाना आले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे’ असं त्यांनी म्हटलं आहे. असं विधान करत त्यांनी चर्चेची दारं अजूनही किलकिली असल्याचे सूतोवाच केले आहे.

अभिनेते नाना पाटेकर हे मात्र शिरूर मतदारसंघातून लढण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहे. त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सध्या रंगली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...