spot_img
अहमदनगरAhmednagr : व्यक्ती मृत.. त्याच्या जागेवर उभा केला खोटा माणूस..अन केला 'इतका'...

Ahmednagr : व्यक्ती मृत.. त्याच्या जागेवर उभा केला खोटा माणूस..अन केला ‘इतका’ मोठा घोटाळा

spot_img

श्रीरामपूर : मयत व्यक्तीच्या जागेवर दुसराच व्यक्ती उभा करत, खोट्या दस्तऐवजाचा वापर करत जमीन बळकावण्याचा प्रकार समोर आला. ही घटना श्रीरामपूरमध्ये घडली.

मारिया वामन प्रभुणे यांनी दीपक सुभाष सुंबे, संतोष वसंत जाधव, अतुल मनोहर भाकरे, मधुसन रमेश खंडेलवाल, जितेंद्र राधामोहन खंडेलवाल, मीना जितेंद्र खंडेलवाल यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीचे वडील वामन किसन प्रभुणे १९८४ मध्ये सेवानिवृत्त झाले व २० जून २००१ पासून श्रीरामपूर येथून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नाहीत. फिर्यादीने श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, असे जाहीर ठरवून मिळण्याकरीता अर्ज दाखल केला होता. १८ जानेवारी २०२३ रोजी कोर्टाने फिर्यादीचे वडील वामन किसन प्रभुणे यांचा दिवाणी मृत्यू झाल्याचे आदेश पारीत केले होते.

असे असताना दीपक सुभाष सुंबे यांनी दुसर्‍याच एका व्यक्तीस वामन किसन प्रभुणे म्हणून उभे केले. त्यांच्या नावाची पिंपळगाव माळवी येथे असलेली जमीन बळकावण्यासाठी खोटे जनरल मुखत्यारपत्र तयार केले.

इतर आरोपींनी त्या कागदपत्रांवर सह्या केल्या. पिंपळगाव माळवी येथील तलाठी कार्यालयात फिर्यादी या वारस नोंदीसाठी गेल्या असता त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...