spot_img
अहमदनगरAhmednagr : व्यक्ती मृत.. त्याच्या जागेवर उभा केला खोटा माणूस..अन केला 'इतका'...

Ahmednagr : व्यक्ती मृत.. त्याच्या जागेवर उभा केला खोटा माणूस..अन केला ‘इतका’ मोठा घोटाळा

spot_img

श्रीरामपूर : मयत व्यक्तीच्या जागेवर दुसराच व्यक्ती उभा करत, खोट्या दस्तऐवजाचा वापर करत जमीन बळकावण्याचा प्रकार समोर आला. ही घटना श्रीरामपूरमध्ये घडली.

मारिया वामन प्रभुणे यांनी दीपक सुभाष सुंबे, संतोष वसंत जाधव, अतुल मनोहर भाकरे, मधुसन रमेश खंडेलवाल, जितेंद्र राधामोहन खंडेलवाल, मीना जितेंद्र खंडेलवाल यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीचे वडील वामन किसन प्रभुणे १९८४ मध्ये सेवानिवृत्त झाले व २० जून २००१ पासून श्रीरामपूर येथून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नाहीत. फिर्यादीने श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, असे जाहीर ठरवून मिळण्याकरीता अर्ज दाखल केला होता. १८ जानेवारी २०२३ रोजी कोर्टाने फिर्यादीचे वडील वामन किसन प्रभुणे यांचा दिवाणी मृत्यू झाल्याचे आदेश पारीत केले होते.

असे असताना दीपक सुभाष सुंबे यांनी दुसर्‍याच एका व्यक्तीस वामन किसन प्रभुणे म्हणून उभे केले. त्यांच्या नावाची पिंपळगाव माळवी येथे असलेली जमीन बळकावण्यासाठी खोटे जनरल मुखत्यारपत्र तयार केले.

इतर आरोपींनी त्या कागदपत्रांवर सह्या केल्या. पिंपळगाव माळवी येथील तलाठी कार्यालयात फिर्यादी या वारस नोंदीसाठी गेल्या असता त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...