spot_img
अहमदनगरअहमदनगर: दुर्देवी घटना! मांजरीला वाचवताना पाच जणांचा मृत्यू, नेमक घडलं काय?

अहमदनगर: दुर्देवी घटना! मांजरीला वाचवताना पाच जणांचा मृत्यू, नेमक घडलं काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
जिल्ह्यातुन एक दुर्देवी घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. एकाच कटूंबातील ५ जणांच्या मृत्यूमुळे नेवासा तालुक्यातील वाकडीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे आणि बाबासाहेब गायकवाड अशी शोष खड्ड्यात बुडालेल्या लोकांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी: नेवासा तालुक्यातील वाकडी गावात सदर घटना घडली आहे. शेण-मुत्र टाकण्यासाठी एक शोषखड्डा शेतकरी कटूंबानी बनवला होता. त्या शोषखड्ड्यात मांजर पडली होती.

मांजरीला वाचवण्यासाठी एकजण बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला, बायोगॅसचा खड्डा शेणाने भरलेला होता त्यामुळे त्यात विषारी वायू निर्माण झालेला होता. वाचवण्यासाठी गेलेला एक जण गुदमरून बुड लागला. ते पाहात इतकं चार जणांनी त्याला वाचवण्याच्या प्रयत्न केला पण दुर्देवाणे यात पाच जणबुडाले.

पाचजणांचा मृत्यूची माहिती मिळताच पोलीस आणि तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली असून आज पहाटेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळालं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...