spot_img
अहमदनगरअहमदनगर : पोलीस पाठलागावर..वाळू वाहतूक करणारी पिकअप विहिरीत कोसळली, चालकासह तीन मजूर...

अहमदनगर : पोलीस पाठलागावर..वाळू वाहतूक करणारी पिकअप विहिरीत कोसळली, चालकासह तीन मजूर…

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : वाळूची बेकादेशीर वाहतूक करणारी पिकअप खोल विहिरीत कोसळून मोठी दुर्घटना झाली. ही घटना धांदरफळ शिवारात घडली आहे. दरम्यान या पिकअप मधील चालक व तीन मजूर देखील पाण्यात बुडाले. त्यातील तीन मजूर विहिरीतून बाहेर येण्यास यश आले, परंतु चालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी : संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. धांदरफळ परिसरातील प्रवरा नदी पात्रातून वाळू उपसा करून वाळूने भरलेली पिकअप ही धांदरफळच्या दिशेने खाली होऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी या पिकअपचा पाठलाग सुरु केला. पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे पिकअप चालक गोरख नाथा खेमनर (वय 23, राहणार डिग्रस, ता. संगमनेर) याच्या लक्षात आले. पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी त्याने भरधाव वेगाने वाहन चालवले. पुढे गेल्यानंतर त्याने आपले वाहन एका शेतात घातले. मध्यरात्री पिकअप चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला. वाळूची रिकामी पिकअप थेट रस्त्यालगत असणार्‍या शेतातील एका खोल विहिरीत कोसळली. या वाहनांमध्ये चालकासह तीन मजूर बसलेले होते.

वाळूची रिकामी पिकअप विहिरीत कोसळली. तिन मजुरांनी दोरीच्या साह्याने विहिरीच्या बाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र पिकअप चालक गोरख खेमनर हा पिकअपसह विहिरीमध्ये बुडाला. विहिरीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. तालुक्यात वाळूची वाहतूक करणारे अनेक वाहने बेकायदेशीर आहे. काही वाहनांना कागदपत्रेही नाही. असे असतानाही वाळू वाहतूक करणारे चालक बेदरकारपणे वाळूची वाहतूक करत आहे. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...