spot_img
अहमदनगरAhmednagar News : अल्पवयीन मुलगा व मुलीचे अपहरण, नगरमधील 'येथील' घटना

Ahmednagar News : अल्पवयीन मुलगा व मुलीचे अपहरण, नगरमधील ‘येथील’ घटना

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून एक अल्पवयीन मुलगा व मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस त्या अल्पवयीन मुलगा व मुलीचा शोध घेत आहे.

भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी (दि. 3) सकाळी आठ ते साडेअकराच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली आहे.

फिर्यादी मुळच्या उत्तरप्रदेश राज्यातील असून त्या सध्या कुटुंबासह भिंगार परिसरात राहत आहे. त्यांची 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी असताना तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक निसार शेख तपास करीत आहेत.

15 वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलाने रविवारी (दि. 4) सायंकाळी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...