spot_img
अहमदनगरAhmednagar News : शेतकऱ्यांकडून निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांची धावपळ..पहा नेमकं काय...

Ahmednagar News : शेतकऱ्यांकडून निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांची धावपळ..पहा नेमकं काय घडलं !

spot_img

अकोले / नगरसह्याद्री : निळवंडे जलाशयाच्या डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्याची मागणी करण्यासाठी जमलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी आज (मंगळवार) निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न केला.

अकोले तालुक्यातील खानापूर शिवारात संतप्त शेतक-यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले होते. पाेलिसांनी आंदाेलकांना वेळीच रोखले. कालव्यातील पाणी गळतीमुळे शेकडो हेक्टर जमीन नापीक होत असल्याचा आरोप यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे यांच्यासह असंख्य शेतकरी यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. सध्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने

या कालव्यातील पाणी गळतीमुळे शेकडो हेक्टर जमीन नापीक होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे कालव्यांच क्रॉंक्रीटीकरणं आणि अस्तरीकरण करावे यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी एकत्र आले होते. यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांकडून कालवा फोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आंदोलकांना रोखले त्यानंतर मग आंदोलकांनी कालव्याजवळच आपला ठिय्या मांडला होता. जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी आल्यानंतर आंदाेलकांनी कालव्यांच क्रॉंक्रीटीकरणं आणि अस्तरीकरण करावे अशी मागणी केली.

यामुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना मदत द्यावी आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढली पण शेतकऱ्यांनी काही ऐकले नाही. अखेर पाेलिसांच्या मध्यस्तीने आंदाेलकांत आणि अधिकऱ्यांत चर्चा झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे पाटलांनी साधला शरद पवारांवर साधला; म्हणाले तुतारी फुंकून काही…

सांगोला / नगर सह्याद्री - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुतारी फुंकून कुठे...

सावधान! विनापरवाना पोस्टर्स लावणाऱ्यावर ‘ती’ कारवाई होणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरात विनापरवाना भिंतीवर, सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचे...

व्यापारी असोसिएशनचा आयुक्तांपुढे समस्यांचा पाढा; मागणी काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील प्रमुख बाजारपेठेला अतिक्रमण धारकांनी विळखा घातला आहे. या अतिक्रमणांमुळे...

प्रियसीसाठी बायकोला सोडलं, मग तिसरीसोबत जुळलं, खटके उडताच नको तेच घडलं…

Maharashtra Crime News: प्रियकराने प्रियसीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, तरूणाने गर्लफ्रेंडसाठी...