spot_img
ब्रेकिंगAhamadanagara: माझी मंत्रालयात ओळख, तुमचे 'ते' काम करतो; 'असा' घातला लाखोंना...

Ahamadanagara: माझी मंत्रालयात ओळख, तुमचे ‘ते’ काम करतो; ‘असा’ घातला लाखोंना गंडा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

आरोग्य विभागात नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवून मेडिकलचे शिक्षण घेणार्‍या तरूणाकडून दोन लाख ९० हजार रूपये घेतले. नोकरी दिली नाही व घेतलेले पैसेही परत दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर तरूणाने पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला. अर्ज चौकशीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ४) रात्री दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सागर भरत मगर (वय २५ रा. देऊळगाव घाट ता. आष्टी, जि. बीड) असे फसवणूक झालेल्याचे नाव आहे.

फिर्यादीवरून गौरव दादासाहेब नरवडे (रा. खातगाव टाकळी ता. नगर) व प्रवीण तान्हाजी राडे (रा. मुंबई, पूर्ण पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मगर हे नगर शहरातील एका कॉलेजमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत असून त्यांची गौरव नरवडे याच्याशी ओळख आहे. ८ जून २०२२ रोजी नरवडे हा मगर यांना म्हणाला, माझी ओळख मंत्रालयातील प्रवीण तान्हाजी राडे यांच्याशी असून त्यांच्या सोबत माझे बोलणे झाले आहे. माझ्याबरोबर तुलाही अरोग्य विभागात नोकरील लावून देतो, असे सांगितले.

८ जूनला मगर व नरवडे हे दोघे राडे याला नगर शहरातील सक्कर चौकातील हॉटेल उदयनराजे येथे भेटले. त्यावेळी राडे याने मगर यांना सांगितले, की मी मंत्रालयात कामाला असून अनेकांची कामे नेहमी करत असतो. माझी सर्व मंत्र्याशी ओळख आहे. तुमचे दोघांचे काम मी ताबडतोब करून देतो, तुम्ही मला पाच लाख रूपये द्या. मी गौरव नरवडे यांच्याशी चर्चा करून तुम्हाला सांगेन व माझे सर्व पैसे गौरव नरवडे यांच्याकडे जमा करा’, असे सांगितले.

मगर यांनी विश्वास ठेऊन एक लाख ५० हजार रूपये ऑनलाईन व एक लाख ४० हजार रूपये रोख स्वरूपात असे एकुण दोन लाख ९० हजार रूपये नरवडे याला दिले. नरवडे याने राडे याच्या खात्यावर पैसे पाठविले. राडे याने मगर यांना नोकरीला न लावता व घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...

…हेच माझे राजकारणातील ‘गुरु’!, माजी खासदार सुजय विखे पाटलांचे वक्तव्य चर्चेत

अहिल्यानगर । नगर सहयाद्री गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी...