spot_img
अहमदनगरAhmednagar News: शेतकरी आक्रमक! बाजार समितीतील कांदा लिलाव पाडला बंद

Ahmednagar News: शेतकरी आक्रमक! बाजार समितीतील कांदा लिलाव पाडला बंद

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री-
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्या नंतर पारनेर बाजार समितीत रविवार १० डिसेंबर रोजी सकाळी कांद्याचे भाव गडगडले, संतप्त शेतकर्‍यांनी कामगार नेते शिवाजी औटी यांच्या नेतृत्वाखाली कांदा लिलाव बंद पाडले.

केंद्र सरकारने शुक्रवारी कांदा निर्यात बंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. रविवारी पारनेर बाजार समितीत कांदा चे लिलाव होते, ४० ते ४५ रुपये किलो ला भाव असलेला कांदा रविवारी २२ ते २८ रुपये पर्यंत गडगडले, यामुळे कामगार नेते शिवाजी औटी यांच्या सह शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत दाखल झाले.

त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. यावेळी भिकाजी जगदाळे, शेतकरी संघटनेचे मुरलीधर जगदाळे, पांडुरंग ढवळे, महेंद्र पांढरकर, राजकुमार मोरे, पांडुरंग पडवळ, कैलास चौधरी, अण्णा मोरे, अर्जुन गंधाकते , ज्ञानदेव पानसरे, भाऊ बोरूडे,पोपट मोरे, शिवाजी गंधाकते, संतोष कावरे आदी सह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी सभापती बाबाजी तरटे, सचिव सुरेश आढाव,संचालक चंदन भळगट, नंदकुमार देशमुख ,किसन गंधाडे, तुकाराम पडवळ, संतोष दिघे, यांनी पारनेर बाजार समिती शेतकर्‍यांन बरोबर असून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णयचा निषेध केला. दरम्यान शेतकरी व सभापती, व्यापारी यांच्या चर्चे नंतर पुन्हा लिलाव सुरू करण्यात आले.

शेतकरी व व्यापारी दोन्ही अडचणींत

कांदा निर्यात बंदी चा केंद्र सरकारने अचानक निर्णय घेतल्याने शेतकरी व व्यापारी दोन्ही अडचणींत सापडले आहेत. कांद्याचे भाव गडगडले आहे. तातडीने निर्यात बंदी उठवली पाहिजे.
-मारूती रेपाळे, अध्यक्ष, पारनेर तालुका व्यापारी संघटना

बाजार समिती शेतकर्‍यांबरोबर

पारनेर बाजार समिती शेतकर्‍यांबरोबर आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा आम्ही निषेध करतो. शेतकर्‍यांचे म्हणणे असेल तर बुधवारी कांदा लिलाव बंद ठेवू मात्र कांदा खराब होऊन शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये याचा विचार करावा.

-बाबाजी तरटे, सभापती बाजार समिती

निर्यात बंदी उठवली नाही तर कांदा लिलाव बेमुदत बंद

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्या मुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पारनेर तालुक्यात तर एकीकडे गारपीट मुळे काही भागातील कांदा चे नुकसान झाले दुसरीकडे आता भाव गडगडले मुळें शेतकरांचे नुकसान होत आहे. कांदा निर्यात बंदी उठवली नाही तर कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवू.

-शिवाजी औटी, कामगार संघटना नेते

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...