spot_img
अहमदनगरPolitics News: प्रशासनाने सत्ताधार्‍यांच्या हातचे बाहुले होऊ नये: काळे

Politics News: प्रशासनाने सत्ताधार्‍यांच्या हातचे बाहुले होऊ नये: काळे

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
लोकसभा निवडणूक प्रचारसभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांच्या विरोधात शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सडकून टीका केली आहे.

काळे म्हणाले, सभा नगर शहरात ८ मेला झाली. त्यात राऊत यांनी सत्ताधार्‍यांचे वाभाडे काढले. गुन्हा दाखल करायचा होता तर तो त्याच रात्री सभेनंतर तात्काळ करायला हवा होता. मात्र दहा दिवसानंतर हा गुन्हा दाखल केला गेला आहे. राजकीय आकसातून या गोष्टी केल्या जात असल्याची टीका काळे यांनी केली आहे. पोलीस प्रशासनाने सत्ताधार्‍यांच्या हातचे बाहुले होऊ नये, असा सल्ला देखील त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

राऊत यांच्या सभेतील वक्तव्या संदर्भात पोलीस अंमलदार अतुल काजळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी राऊत नगरमध्ये आले होते व त्यांची ८ मे रोजी लेरा ब्रूस विद्यालयाच्या मैदानावर प्रचार सभा झाली होती. या सभेत त्यांनी प्रक्षोभक व्यक्तव्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे.

औरंगजेब याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे. ती जी माती आहे ती औरंगाजेबाची माती आहे. त्या मातीतले हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेबचा जन्म नरेंद्र मोदींच्या गावात झाला आहे, इतिहास पहा तुम्ही. दावत नावाच गाव आहे, अहमदाबादच्या बाजूला. औरंगजेब तेथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी ते औरंगजेबी वृत्तीने वागत आहेत. २७ वर्षे तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढत होता आणि शेवटी त्या औरंगजेबाला आम्ही या महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणलेली आहे. तेव्हा नरेंद्र मोदी तू कौन है’, असे वक्तव्य राऊत यांनी प्रचारसभेत केले होते. याप्रकरणी राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण काळे म्हणाले, केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणार्‍या देशातील ईडी, सीबीआय, इन्कम टॅस या यंत्रणांचा गैरवापर मागील दहा वर्षांमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. पोलीस हा राज्य सरकारचा विषय आहे. आता या यंत्रणाचा देखील सरकार कडून गैरवापर सुरू आहे. एखाद्या वक्तव्याची सोयीस्कररीत्या चिरफाड करून राजकीय आकसातून गुन्हे दाखल केले जात आहेत. संजय राऊत यांच्यावर यापूर्वी देखील सत्तेचा गैरवापर करून खोट्या नाट्या कारवाया करण्यात आल्या. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. मात्र ते लढवय्ये आहेत. ते थांबले नाहीत आणि थांबणार ही नाहीत, असा ठाम विश्वास काळे यांनी व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी खासदाराच्या PA ची भररस्त्यात हत्या, तलवारीने पाडले तुकडे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पंजाबच्या लुधियानामधून एक हादरवाणारी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री...

आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ हिंदुत्वावादी संघटनांचा रविवारी मेळावा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्वाची...

‘कोठला परिसरात डेंग्यू मुक्त अभियान’; आयुक्त डांगे यांनी साधला नागरिकांशी संवाद..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाच्या तिसर्‍या आठवड्यात कोठला परिसरात...

तयारीला लागा! भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी पदाधिकार्‍यांना आवाहन; महापालिकेवर…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकार्‍यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त करत शहर...