spot_img
अहमदनगरधक्कादायक! मित्रांनी मित्राला संपवलं, नगर जिल्ह्यात कुठे घडला प्रकार?

धक्कादायक! मित्रांनी मित्राला संपवलं, नगर जिल्ह्यात कुठे घडला प्रकार?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात शुक्रवार दि. २२ मार्चला रात्री पूर्वीच्या वादातून दोन मित्रांनी आपल्या मित्राला दारू पाजून त्याचा धारदार चाकूने गळा कापून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत (वय २३, रा. समनापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, समनापूर शिवारातील हॉटेल नेचर जवळील मोकळ्या मैदानात एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.

आरोपींची माहिती मिळताच पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहल सारबंदे, धनंजय महाले, विशाल कर्पे यांनी किसन सरदार सावंत, सागर रमेश मुळेकर (वय २१) व राजेश मनोज मकवाणे (वय १९, दोघेही रा. समनापूर) आणि एकजण अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ सुनील शोभाचंद सावंत यांच्या फित्यादीवरुन वरील तीन आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...