spot_img
महाराष्ट्रआ. लंकेंसह वकिलांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला, केली 'ही' मागणी

आ. लंकेंसह वकिलांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला, केली ‘ही’ मागणी

spot_img

पारनेर / नगर सहयाद्री : नगर जिल्ह्यातील राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याची २५ जानेवारी २०२४ रोजी निर्घृण  हत्या झाली. त्या घटनेने वकील वर्ग हादरुन गेलेला आहे. त्यामुळे राज्यात वकील संरक्षक कायदा तातडीने लागू करावा व वकील हत्याकांड खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करावी असे निवेदन नगर जिल्ह्यातील वकील संघाचे पदाधिकारी व आमदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंगळवारी दिले.

जिल्ह्यातील वकील संघटनेचे ९ फेब्रुवारी पर्यंत कामकाज बंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्यातील वकिलांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहेत. ही गोष्ट संपूर्ण न्याय व्यवस्थेसाठीच चिंताजनक आहे. काही राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातही वकील संरक्षण कायदा लागू होणे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने येणाऱ्या अधिवेशनात हा कायदा मंजूर करावा व राहुरी येथील आढाव दाम्पत्याची हत्या झाली या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अहमदनगर जिल्हा वकील संघटनेचे वकील उपस्थित होते.

लक्षवेधी सूचना करण्याची मागणी
राहुरी तालुक्यातील अॅड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनिषा आढाव या दाम्पत्याची निघृण हत्या झालेली असून घटना अतिशय निदंनीय आहे. त्याबाबत आपण पारनेर तालुक्यातील विधानसभा सदस्य या नात्याने सदर घटनेसंदर्भात आपण विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडावी.

त्याबाबत योग्य तो निर्णय आपल्या स्तरावरुन घ्यावा, वकीलांना ‘अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट’ मंजूर होणेबाबत  सहकार्य करावे असे निवेदन पारनेर तालुका बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अॅड टी.बी.उबाळे, उपाध्यक्ष अॅड बी.ई.तराळ, सचिव अॅड. ए.पी.औटी आदींसह गणेश कावरे व पदाधिकाऱ्यांनी आमदार नीलेश लंके यांना दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...