spot_img
आरोग्यHealth: वरदानच! 'या' फळांचे पाने ही आरोग्यवर्धक, आजारासाठी ही फायदेशीर ? पहा..

Health: वरदानच! ‘या’ फळांचे पाने ही आरोग्यवर्धक, आजारासाठी ही फायदेशीर ? पहा..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
बदलत्या मौसमात आरोग्याची काळजी घेणे गरजेची आहे. उत्तम आरोग्यसाठी योग्य अहार पण महत्वाचा आहे. ज्यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात, हिवाळ्यात पेरू, संत्री यासारखी फळे खाण्यात एक वेगळाच आनंद असतो.अनेकांना गोड पेरू आणि काळे मीठ याचे वेड असते. तुम्हाला माहित आहे की पेरूच नाही, तर त्याची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत
पेरूच्या हिरव्या पानांमध्येही भरपूर व्हिटॅमिन सी असते. या फळाची पाने रोज योग्य प्रमाणात चघळल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. याशिवाय पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट्स देखील असतात, जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी पेरूची पाने चावा.

सर्दी आणि फ्लूची लक्षणे
पेरूच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे आपल्याला सर्दी किंवा फ्लूपासून वाचवतात. या गुणामुळे ही पाने शरीरातील सूज कमी करण्याचे काम करतात. सर्दी-खोकला किंवा वारंवार त्रास होत असल्यास पेरूच्या पानांचे पाणी प्यावे.

वजन कमी करण्यास मदत करते
पेरू आणि त्याच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते. फायबर शरीरात कॉम्प्लेक्स स्टार्चचे साखरेत रूपांतर करत नाही. याशिवाय या फळाची पाने खाल्ल्याने चयापचय क्रियाही वाढते. तुमचे वजन कमी होत असेल, तर पेरूच्या पानांना तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा.

मधुमेहवर नियंत्रण
पेरूच्या पानांमध्ये रक्तातील साखर कमी करण्यासाठी प्रभावी संयुगे असतात. या कारणास्तव हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही ते रिकाम्या पोटी प्यायले तर तुम्हाला एकाच वेळी अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...