spot_img
अहमदनगरmp sujay vikhe patil : मोदी गॅरंटी म्हणजे १४० कोटी जनेतेचा समग्र...

mp sujay vikhe patil : मोदी गॅरंटी म्हणजे १४० कोटी जनेतेचा समग्र विकास : खा. सुजय विखे पाटील

spot_img

कर्जत । नगर सह्याद्री
mp sujay vikhe patil : भारताने अमृतकाळात प्रवेश केला असून मोदी पर्वात जगावर आपला ठसा उमटविला आहे. देशात सुरू असलेली मोदी गॅरंटी ही निवळ घोषणा नसून १४० कोटी जनतेच्या विकासाची हमी असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या केवळ १० वर्षाच्या काळात विकसित देशाकडे वाटचाल केली चालू केली आहे. ११ व्या स्थानावर असेललेली अर्थव्यवस्था मोदीजींनी ५ व्या स्थानावर आणली. यामुळे मोदी गॅरंटी म्हणजे १४० कोटी जनतेच्या विकासाचा मुलंमत्र असल्याचेही खा. सुजय विखे म्हणाले. ते कर्जत येथिल कर्जत तालूक्यातील निमगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार राम शिंदे यांच्या सह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सुजय विखे म्हणाले की मोदी पर्वात सबका साथ, सबका विकास या भावनेतून अशा समाजाची निर्मिती केली, जिथे सर्वांना स्थान आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जिवंत ठेवला. मोदीजींनी समृध्द व सुरक्षित देशाचा संकल्प केला आहे. आणि तो मोदी गॅरंटीतून जपला जाणार आहे. आज संपुर्ण जगाला भारताच्या आर्थिक धोरणांवर विश्वास निर्माण झाला आहे.जगभरातून विविध गुंतवणुकीचा ओघ वाढत चालला आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. असे सुजय विखे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...