spot_img
ब्रेकिंग‘अवकाळी’ पावसाची पुन्हा एन्ट्री! देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात धुमाकूळ

‘अवकाळी’ पावसाची पुन्हा एन्ट्री! देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात धुमाकूळ

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यात पावसाने हजेरी लावली. पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शयता कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने काल (२६ फेब्रुवारी) हजेरी लावली. देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला. कडकडाट आणि वादळी वार्‍यांसह पाऊस झाला.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुयाला रात्री आठ वाजताचे सुमारास अचानक अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने त्याचा फटका रब्बी हंगाममधील गहू, हरभरा, मकासह फळपिकांना बसला असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

विजेच्या कडकडाटासह चाळीसगाव शहरासह तालुयातील अनेक भागात हा गारपीटसह मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुयातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

यात सर्वाधिक गहू आणि हरभरा पिकाला फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसाने गहू, हरभरा, संत्रा पिकाला तडाखा बसला आहे. काढणीला आलेल्या शेतपिकांना याचा फटका बसत आहे. वादळी वार्‍यामुळे संत्रा बागेत फळाची गळ झाल्याने नुकसान झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...