spot_img
अहमदनगरअजित पवार किंग बनतील की किंगमेकर? आमदार अपात्र झाल्यास 'अशी' बदलणार गणिते

अजित पवार किंग बनतील की किंगमेकर? आमदार अपात्र झाल्यास ‘अशी’ बदलणार गणिते

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रात मागील २ वर्षात २ मोठे राजकीय बंड झाले. त्यात २० जून २०२२ ला शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरेंविरोधात बंड करत भाजपसोबत सत्तेत गेले. वर्षभरापूर्वी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपा-शिंदेसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ते देखील ४० आमदारांसह सत्तेत आले.

महाराष्ट्रात सध्या विधानसभेचे एकूण २८६ आमदार आहेत, त्यात बहुमतासाठी १४४ आमदारांचे पाठबळ हवे. जर शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरले तर आमदारांची संख्या २७० इतकी होईल. अशावेळी बहुमतासाठी १३६ आमदारांची गरज भासेल. सध्या भाजपाकडे १०४, अजित पवारांकडे ४१ तर शिवसेना शिंदे गटाकडे ४० आमदार आहेत. १६ आमदार अपात्र घोषित केले तर शिंदे गटाकडे २४ आमदारांचे संख्याबळ राहील.

त्यामुळे आमदार अपात्र झाले तरी महायुतीच्या सरकारला कुठलाही धोका नाही. परंतु त्यामुळे सरकारमध्ये नेतृत्व बदल होणार हे निश्चित आहे. अजित पवार जेव्हापासून या सरकारमध्ये सहभागी झालेत तेव्हापासून ते मुख्यमंत्री होतील अशी विधाने समोर येत आहेत. बहुमतात असतानाही भाजपाला अजित पवारांची गरज का पडली?

शिंदेंना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री बनवतील अशी चर्चा होऊ लागली. आता जेव्हा विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेचा निकाल सुनावणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार मुख्यमंत्री बनणार की केवळ किंगमेकर राहणार या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्करांच्या घरी राडा? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...

भाजपचे उमेदवार ठरले, आज पहिली यादी? कुणाला मिळणार डच्चू! वाचा सविस्तर…

Politics News : राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना दिवाळीपूर्वीच मिळणार खुशखबर!

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. आजच्या दिवशी...

४२ लाखांची रोकड पकडली! नगरमध्ये पैसाच-पैसा? शहरात पुन्हा उडाली खळबळ..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने प्रशासनाला कडक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या...