spot_img
आर्थिकLPG सिलेंडर बुक करताच मिळेल ५० लाखांचा विमा, एक रुपयाही लागत नाही

LPG सिलेंडर बुक करताच मिळेल ५० लाखांचा विमा, एक रुपयाही लागत नाही

spot_img

नगर सह्याद्री टीम : आजकाल सर्वांच्याच घरात एलपीजी सिलिंडर आहे. सर्वचजण आपण महिना दोन महिन्याला गॅस सिलेंडर रिफील करतोच. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की या सिलेंडरवर तुम्हाला सरकारकडून 50 लाख रुपयांचा बेनिफिट मिळतो.

देशातील सरकारी तेल कंपन्या एलपीजी वापरणाऱ्यांना 50 लाख रुपयांपर्यंतचे गॅस सिलिंडर विमा संरक्षण देतात. तुम्ही सिलिंडर बुक करताच तुमच्या कुटुंबाला हा विमा मिळेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या विम्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून एक रुपयाही भरावा लागत नाही. एलपीजी सिलिंडरमुळे अपघाताचा धोका असतो. अनेकदा लोकांच्या घरात सिलिंडर फुटल्याच्या बातम्या आपण पाहतो. हे विमा संरक्षण सरकारकडून अशा घटनांमधून सावरण्यासाठीच दिले जाते.

सरकारी तेल कंपन्यांकडे करा क्लेम
अशा अपघातांनंतर नुकसान भरपाई ग्राहकाला दिलीजाते. कोणताही ग्राहक आपल्या कुटुंबासाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून 50 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम करू शकतो.

विम्याच्या अटी काय?
>> अशा घटनांमध्ये सरकार प्रति सदस्य 10 लाख रुपये देते.
>> याशिवाय संपूर्ण कुटुंबासाठी कमाल 50 लाख रुपयांची मर्यादा आहे.
>> केवळ मालमत्तेचे नुकसान झाले असेल, तर या स्थितीत 2 लाख रुपयांचा क्लेम उपलब्ध आहे.
>> एखाद्याचा मृत्यू झाल्यास वैयक्तिक अपघात संरक्षण म्हणून ६ लाख रुपये उपलब्ध आहेत.
>> उपचारासाठी प्रति सदस्य 2 लाख रुपये उपलब्ध असून कमाल 30 लाख रुपये दिले जातात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...