spot_img
अहमदनगरविरोधकांकडून आरोप करून निवडणूकीत प्रसिद्धी मिळवण्याचे काम ; विखेंनी हाणला लंकेंना टोला

विरोधकांकडून आरोप करून निवडणूकीत प्रसिद्धी मिळवण्याचे काम ; विखेंनी हाणला लंकेंना टोला

spot_img

कर्जत । नगर सह्याद्री :

ही देशाची निवडणूक असून देशाचा पंतप्रधान ठरविणारी निवडणूक आहे यामुळे शेवटचा मतदार महत्वाचा आहे. त्यापर्यंत पंतप्रधान मोदींचे कार्य पोहचवा असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान मोदींनी राबविलेल्या योजनेचा लाभ सर्व घटकांना झाला आहे. यामुळे देशातील लोकांच्या मनात मोदीच आहेत. आपल्याला फक्त मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहचवायचे आहे. असे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले. ते कर्जत येथील गाव भेट दौऱ्यादरम्यान बोलत होते.

अहिल्यानगर लोकसभेची निवडणूक अतिंम टप्प्यात आली असताना महायुतीचे उमेदवार खा. डॉ.सुजय विखे यांनी आपल्या प्रचाराची गती वाढवली आहे. गावो गावी भेटी देऊन, ते लोकांना देशाचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच योग्य पर्याय असल्याचे मतदारांना समजावून सांगत आहेत. विकास कामाच्या मुद्यावर त्यांनी आपल्या प्रचार कायम ठेवला आहे. कर्जत तालूक्यातील *माळंदी* येथील गावात महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासह आमदार प्रा. राम शिंदे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खा. डॉ. विखे म्हणाले की, सदरची निवडणूक विरोधकांनी अतिशय खालच्या पातळीवर आणली आहे. विकास कामा व्यतिरिक्त इतर सर्व मुद्यांवर ते काम करत आहेत. कारण त्यांच्याकडे सांगायला काहीच नाही. केवळ आरोप करून निवडणूकीत प्रसिद्धी मिळवण्याचे काम त्यांनी चालवले आहे. यामुळे जनतेची प्रचंड नाराजी दिसून येत आहे. १३ मे रोजी त्यांना मतदार आपली जागा दाखवतील टोला हाणला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारने दोन पर्वात देशात असंख्य विकास कामे केली आहे. मागील १० वर्षात देशात झालेला विकास जनतेला माहित आहे. यामुळे मोदींच्या हमीवर लोकांचा विश्वास आहे. यामुळे आपल्याला केवळ मतदानाचा टक्का वाढवून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करायचे आहे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी प्रा. राम शिंदे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राम शिंदे म्हणाले की, डॉ. सुजय विखे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिलेदार असून त्यांना विजयी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आद्य कर्तव्य आहे. आपला विजय नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा, झेडपी निवडणुकांचा ढोल वाजला

फेर प्रभाग रचना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश मुंबई | नगर सह्याद्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला निवडणुकीचा प्लान!, युती होणार नाही, त्या..

Maharashtra politics: चार महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे कोर्टाने आदेश...

अर्बन बँक घोटाळा प्रकरण: पुन्हा महत्वाची अपडेट,आरोपींवर कारवाई करा! मुख्यमंत्र्यांनाकडे कोणी केली मागणी? पहा..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - नगर अर्बन (मल्टीस्टेट) को-ऑप. बँक (अहमदनगर) अहिल्यानगर ही नगर जिल्ह्यातील...

‘अहिल्यानगर मनपा आरोग्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय...