spot_img
अहमदनगरAhmednagar: 'महिलांची टोळी मुद्देमालासह जेरबंद', 'असा' साधायची डाव

Ahmednagar: ‘महिलांची टोळी मुद्देमालासह जेरबंद’, ‘असा’ साधायची डाव

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री-
बसमध्ये प्रवाशांचे दागिने व रोख रकमेची चोरी करणारी महिला आरोपींची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्या महिलांकडून २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

फिर्यादी रुपेश रोहिदास गायकवाड (वय ३२, रा. काळकुप, ता. पारनेर) हे २२ मे २०२३ रोजी तारकपूर बस स्टँड येथून आळेफाटा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असतांना अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम सोन्याचे चैन चोरुन नेली होती. या घटनेबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. अहमदनगर जिल्ह्यामध्ये बस स्टँडवर चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार पोलिस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ. सुनील चव्हाण, संदीप पवार, अतुल लोटके, पोना. रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, पोकॉ. भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, मपोकॉ. सोनाली साठे यांचे पथक नेमले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १८ डिसेंबरला अहमदनगर शहरातील बस स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपींची माहिती घेतली जात होती. पोनि दिनेश आहेर यांना त्यावेळी तीन महिला तारकपुर बस स्टँड येथे चोरी केलेले सोन्याचे दागिने घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पथकास दिली.

पथकाने तारकपूर बस स्टँड येथे सापळा रचून तीन संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यामध्ये छाया किसन भोसले (वय ५०, रा. माळीवाडा), जमुना संदीप काळे (वय २६, रा. वाकी, ता. आष्टी), शितल आदिनाथ भोसले (वय २२, रा. हातवळण, ता. आष्टी) यांचा समावेश आहे. त्या महिलांची माहिला पोलीस अंमलदारमार्फत झडती घेताली असता त्यांच्या जवळील पिशव्यांत सोने व रोख रक्कम २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्याकडील रोख रक्कम व दागिण्याबाबत विचारपूस केली असता जिल्ह्यातील नेवासा, जामखेड, पारनेर येथील बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे जिल्ह्यात १० गुन्हे उघडकीस आले आहेत. या महिलांना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...

…हेच माझे राजकारणातील ‘गुरु’!, माजी खासदार सुजय विखे पाटलांचे वक्तव्य चर्चेत

अहिल्यानगर । नगर सहयाद्री गुरुपौर्णिमेनिमित्त माजी खासदार व भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डी...

नगर शहरातील मावा कारखान्यांवर रेड; पोलीस धडकताच घडलं असं काही..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील नीलक्रांती चौक आणि दिल्लीगेट परिसरात बेकायदा सुगंधी तंबाखू आणि...