spot_img
ब्रेकिंगआरक्षण टिकणार? सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल, यांनी केला 'मोठा' दावा

आरक्षण टिकणार? सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल, यांनी केला ‘मोठा’ दावा

spot_img

छत्रपती संभाजीनगर। नगर सहयाद्री
राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या बाबत मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.

या आधी देखील दोन वेळा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र, या विरोधात याचिका दाखल करुन आरक्षण रद्द करण्यात आले होते. त्यामुळे एक बाजू ऐकून आरक्षणाची अडचण वाढू नये, यासाठी ही कॅव्हेट दाखल करण्यात आली असल्याचे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. तर या बाबत कोणताही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे विनोद पाटील यांनी म्हटले आहे. या वेळी दिलेले मराठा आरक्षण टिकेल, असा मला विश्वास वाटत असल्याचे विनोद पाटील यांनी म्हटले आहे. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घ्यावे, तसेच ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत, त्यांच्यासाठी हे दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

आरक्षण टिकवण्याची जबाबदारी शासनाची आहे. पण शासनावर अवलंबून न राहता कोणी याचिका दाखल केली तर मराठा समाजाचे म्हणणं ऐकावं यासाठी हे कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टात क्रिएटिव्ह याचिक पेडिंग आहे. यापुढे देखील माझे न्यायालयीन लढाई सुरू राहील आणि त्यासाठी हे कॅव्हेट दाखल केला असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...