spot_img
ब्रेकिंगराष्ट्रवादीची ताकद वाढणार? अजित दादांना 'त्यांनी' पुन्हा पाठिंबा दिला!

राष्ट्रवादीची ताकद वाढणार? अजित दादांना ‘त्यांनी’ पुन्हा पाठिंबा दिला!

spot_img

Politics News: Politics News: राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती असो वा मविआ सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्यावर चर्चा होत असून बैठकांचे सत्र सुरू आहे. दरम्यान सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू आहे.

दरम्यान, आता अजित पवार यांना दिलासा दिणारी बातमी समोर आली. विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांची ताकद आणखी वाढली आहे. ऑल इंडिया जमात ए सलमानी समाजाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पुण्यातील घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात बुधवारी ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी माहिती देण्यात आली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया जमात-ए-सलमानी समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देशभरात बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. सलमानी समाजासह बंजारा समाज, कामगार वर्ग, अल्पसंख्याक समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहत असल्याने पक्ष अधिक सक्षम होत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्यापक होत आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...