spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! मनोज जरांगे पाटील आता उपोषण करणार नाहीत; दसरा मेळाव्यात घेणार...

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील आता उपोषण करणार नाहीत; दसरा मेळाव्यात घेणार शपथ?

spot_img

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचे गुरु बीडच्या नारायण गडाचे महंत शिवाजी महाराजांनी मोठे विधान केले आहे. जरांगे पाटील पुढच्या काळात उपोषण करणार नाहीत, असे मोठे संकेत महंत शिवाजी महाराजांनी दिले आहेत. जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होणारी नारायण गडाची भूमि ही तपाची भूमी आहे. आणि उपोषण देखील एक तप आहे आणि याच तपाची सांगता करण्यासाठी पुढे उपोषण करणार नाही अशी प्रतिज्ञा घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे या नारायण गडाच्या तपाच्या भूमित येत आहेत. असे मोठे विधान महंत शिवाजी महाराजांनी केले आहे.

दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी नारायणगडच का निवडला? त्याचं कारण ही भूमी तपाची भूमी आहे, इथे साधू संतांनी तप केला आहे. नगद नारायण यांनी तपश्चर्या केली म्हणून पंढरपूरचा देव नारायणगडावर आले. तस आमच्या जरांगे पाटलांनी तप केला..उपोषण म्हणजे एक तप आहे आणि म्हणून या तपाची सांगता म्हणून इथ यायचं आणि या तपाची सांगता करायची, की इथून पुढे मी उपोषण करणार नाही. त्यामुळं ही प्रतिज्ञा करण्यासाठी मेळावा घेतला आणि यासाठी जरांगे पाटील येत आहेत. असं म्हणत महंत शिवाजी महाराजांनी मोठे विधान आणि संकेत दिले आहेत.

तत्पुर्वी मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या वेळी उपोषण सोडले, त्यावेळी महंत शिवाजी महाराजांच्या हाताने पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडल आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा शब्द म्हणजे जरांगे पाटलांसाठी शेवटचा शब्द आहे. त्यामुळे महंत शिवाजी महाराजांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...