spot_img
महाराष्ट्रसप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

spot_img

Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि धरणे तुडूंब भरली आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट तर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट आहे.

या वर्षी भारतात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सप्टेंबरच्या मध्यावर कमी दाबाची प्रणाली विकसित होऊन पाऊस पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

सामान्यतः मान्सून जून महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबरमध्ये परतीचा प्रवास सुरू होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून पाऊस थांबतो. पण यावेळी मान्सून लवकर परतण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

पुणे / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या...

धक्कादायक! मुख्याध्यापिकेनेच शिक्षक पतीला संपवलं, मृतदेह टाकला जाळून, कुठे घडला प्रकार पहा

यवतमाळ / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीस आले आहे....

IAS पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट; ‘सर्वोच्च न्यायालयाने जामीन..’

मुंबई । नगर सहयाद्री:- वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च...

नगर जिल्ह्यात खळबळ! बिबट्या अडकला पिंजऱ्यात; एकाच ठिकाणी चार-चार?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुकमध्ये एकापाठोपाठ चार बिबटे जेरबंद करण्यात आले...