spot_img
महाराष्ट्रसप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळणार का? हवामान विभागाने दिली मोठी माहिती..

spot_img

Rain update: या वर्षी राज्यभरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांतील नदी-नाले आणि धरणे तुडूंब भरली आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट तर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागानुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट आहे.

या वर्षी भारतात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सप्टेंबरच्या मध्यावर कमी दाबाची प्रणाली विकसित होऊन पाऊस पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

सामान्यतः मान्सून जून महिन्यात सुरू होतो आणि सप्टेंबरमध्ये परतीचा प्रवास सुरू होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून पाऊस थांबतो. पण यावेळी मान्सून लवकर परतण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...