spot_img
अहमदनगरनिघोजकर टाकणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार? कारण काय..

निघोजकर टाकणार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार? कारण काय..

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीची यात्रोत्सवास सोमवार दि.२२ एप्रिल पासून सुरवात होणार असून यात्रेसाठी कुकडी डावा कालव्याला पाणी न सोडल्यास लोकसभा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर निघोज ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असल्याचा ईशारा मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

’नगर सह्याद्री’ शी बोलताना लंके यांनी सांगितले की, राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या निघोज येथील मळगंगा देवीचा यात्रा उत्सव देवीला हळद लावण्याचा कार्यक्रम सोमवार दि.२२ एप्रिल पासून सुरू होत आहे. ८५ फुट उंचीच्या काठीची मिरवणूक मंगळवार दि.२३ रोजी तसेच देवीची मुख्य यात्रा दि.१ मे पासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी राज्यातून लाखो भावीक देवी दर्शनसाठी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र सध्या निघोज आणी परिसरात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

परिसरातील नदीला तसेच जलसिंचन योजनेसाठी पाणी सोडण्याची मागणी कुकडी डावा कालवा नारायणगाव विभागाच्या अधिकार्‍यांकडे केली होती. मात्र फक्त दोन दिवस कमी क्षमतेने पाणी सोडून अधिकार्‍यांनी निघोज परिसरातील जनतेची खिल्ली उडविली आहे. जवळपास निघोज आणी पारनेर तालुक्यातील सोळा ते अठरा गावांसाठी दहा दिवसाचे आवर्तन देण्याची गरज असताना केवळ दोन दिवस पाणी दिल्याने पिण्याच्या पाण्यासाठी असलेले उदभव कोरडे ठाक पडले आहेत. नदीला पाणी नाही सर्व जलसिंचन बंधारे कोरडे आहेत अशी भयानक परिस्थीती निर्माण झाली आहे.

उन्हाळा कडक आहे साधारण ३५ ते ३८ तापमान आहे. पाण्याची टंचाई सातत्याने जाणवत असल्याने गोधन सुद्धा संकटात सापडले आहे. अशातच मळगंगा देवीचा यात्रोत्सव जवळ आला आहे. पिण्यासाठी व भावीकांच्या स्वच्छतेसाठी किमान आठ दिवसाचे आवर्तन दि. १५ एप्रिल पासून सोडण्याची नितांत आवश्यकता असून पाणी न सोडल्यास निघोज ग्रामस्थ लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकतील असा ईशारा ज्ञानदेव लंके तसेच निघोज व मुंबईकर ग्रामस्थ यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...