spot_img
अहमदनगरका झाला शिर्डीत पराभव? माजी खा. लोखंडे यांनी स्पष्टच सांगितले 'कारण'

का झाला शिर्डीत पराभव? माजी खा. लोखंडे यांनी स्पष्टच सांगितले ‘कारण’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांचा भाजपला राजकीय फायदा होणार असे गणित मांडले जात होते. विरोधकांकडून यासंबंधी आरोपही केले जात होते. मात्र, शिर्डीतील महायुतीचे पराभूत उमेदवार, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी वेगळेच विश्लेषण केले आहे. लोखंडे यांनी म्हटले आहे की, अयोध्यामध्ये बांधण्यात आलेले राम मंदिर हेही एक माझ्या पराभवाचे कारण आहे. कारण शिर्डी लोकसभा मतदारसंघात रावणाला मानणारा आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांना राम मंदिर रुचले नाही, असे लोखंडे यांनी कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. लोखंडे यांच्या या विधानावरून आता नव्या चर्चेला तोंड फुटणार आहे.

दरम्यान माजी खासदार लोखंडे यांनी महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरेयांनी त्यांचा पराभव केला. लोखंडे मूळचे जामखेड तालुयातील आहेत. पूर्वी ते कर्जत-जामखेडमधून आमदार होते. त्यामुळे अलीकडेच त्यांनी कर्जतला भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

शिर्डीत आपला पराभव का झाला? काय कारणे असावीत? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांनी विचारला. त्याला उत्तर देताना लोखंडे म्हणाले, शिर्डी मतदारसंघात आदिवासी पट्टा आहे. तेथे रावणाला मानणारे बरेच आदिवासी आहेत. त्यांना राममंदिर रुचलेले दिसत नाही. त्याचा फटका मतदानाला बसला. याशिवाय त्या मतदारासंघात राजकीय गटतट मोठे आहेत. कारखानदारांच्या साम्राज्यांचे गटतट आहेत. त्यांच्यात कमालीचा संघर्ष आहे, त्यांच्या संर्घषात माझा बळी गेला, असे सांगून लोखंडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्षामुळेही आपला पराभव झाल्याकडे लक्ष वेधले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...