spot_img
ब्रेकिंगकोण मारणार महाराष्ट्राचे मैदान? काय सांगतो सर्वे? पहा एका क्लिकवर

कोण मारणार महाराष्ट्राचे मैदान? काय सांगतो सर्वे? पहा एका क्लिकवर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
‘अबकी पार 400 पार’चा नारा देत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघापैकी 45 जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष्य असल्याचं महायुतीने जाहीर केलं आहे, दुसरीकडे ‘अबकी पार भाजप तडीपार’चा नारा महाविकास आघाडीने दिला आहे.

अशा तापलेल्या वातावरणात मतदारराजाच्या मनात नेमकं काय? ते एका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्व्हे मधून समोर आलं आहे. राज्यातील जनतेचा मूड काय? मतदार राजा नेमका विचार करतोय काय? याचा निष्कर्ष आता उजेडात आला आहे.

एका वृत्त वाहिनीच्या सी-व्होटर सर्वेच्या माहितीनुसार राज्याच्या मतदारांनी पंतप्रधानपदासाठी एकसष्ट टक्के पसंती नरेंद्र मोदी यांनाच दिली असून एकोणतीस टक्के मतदारांना पंतप्रधानपदी राहुल गांधी यांना निवडले आहे. तर सहा टक्के लोकांनी दोन्ही नेत्यांना ना पसंती दर्शवली असून उर्वरित चार टक्के लोकांनी उत्तरचं दिल नाही.

महाराष्ट्रा राज्यात एनडीएला एकेचाळीस टक्के तर इंडी आघाडीला एकेचाळीस टक्के मतं पडतील आणि इतर पक्षांना 18 टक्के मतं पडू शकतात. केंद्र सरकारच्या कामावर महाराष्ट्रातील 31 टक्के जनता खूप समाधानी आणि 30 टक्के जनता कमी समाधानी आहे. तर 35 टक्के जनता असमाधानी असल्याचे सी-व्होटर सर्वेच्या माध्यमातून समोर आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...