spot_img
ब्रेकिंगकोण मारणार महाराष्ट्राचे मैदान? काय सांगतो सर्वे? पहा एका क्लिकवर

कोण मारणार महाराष्ट्राचे मैदान? काय सांगतो सर्वे? पहा एका क्लिकवर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
‘अबकी पार 400 पार’चा नारा देत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघापैकी 45 जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष्य असल्याचं महायुतीने जाहीर केलं आहे, दुसरीकडे ‘अबकी पार भाजप तडीपार’चा नारा महाविकास आघाडीने दिला आहे.

अशा तापलेल्या वातावरणात मतदारराजाच्या मनात नेमकं काय? ते एका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्व्हे मधून समोर आलं आहे. राज्यातील जनतेचा मूड काय? मतदार राजा नेमका विचार करतोय काय? याचा निष्कर्ष आता उजेडात आला आहे.

एका वृत्त वाहिनीच्या सी-व्होटर सर्वेच्या माहितीनुसार राज्याच्या मतदारांनी पंतप्रधानपदासाठी एकसष्ट टक्के पसंती नरेंद्र मोदी यांनाच दिली असून एकोणतीस टक्के मतदारांना पंतप्रधानपदी राहुल गांधी यांना निवडले आहे. तर सहा टक्के लोकांनी दोन्ही नेत्यांना ना पसंती दर्शवली असून उर्वरित चार टक्के लोकांनी उत्तरचं दिल नाही.

महाराष्ट्रा राज्यात एनडीएला एकेचाळीस टक्के तर इंडी आघाडीला एकेचाळीस टक्के मतं पडतील आणि इतर पक्षांना 18 टक्के मतं पडू शकतात. केंद्र सरकारच्या कामावर महाराष्ट्रातील 31 टक्के जनता खूप समाधानी आणि 30 टक्के जनता कमी समाधानी आहे. तर 35 टक्के जनता असमाधानी असल्याचे सी-व्होटर सर्वेच्या माध्यमातून समोर आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...