spot_img
ब्रेकिंगकोण मारणार महाराष्ट्राचे मैदान? काय सांगतो सर्वे? पहा एका क्लिकवर

कोण मारणार महाराष्ट्राचे मैदान? काय सांगतो सर्वे? पहा एका क्लिकवर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
‘अबकी पार 400 पार’चा नारा देत भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघापैकी 45 जागांवर विजय मिळवण्याचं लक्ष्य असल्याचं महायुतीने जाहीर केलं आहे, दुसरीकडे ‘अबकी पार भाजप तडीपार’चा नारा महाविकास आघाडीने दिला आहे.

अशा तापलेल्या वातावरणात मतदारराजाच्या मनात नेमकं काय? ते एका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्व्हे मधून समोर आलं आहे. राज्यातील जनतेचा मूड काय? मतदार राजा नेमका विचार करतोय काय? याचा निष्कर्ष आता उजेडात आला आहे.

एका वृत्त वाहिनीच्या सी-व्होटर सर्वेच्या माहितीनुसार राज्याच्या मतदारांनी पंतप्रधानपदासाठी एकसष्ट टक्के पसंती नरेंद्र मोदी यांनाच दिली असून एकोणतीस टक्के मतदारांना पंतप्रधानपदी राहुल गांधी यांना निवडले आहे. तर सहा टक्के लोकांनी दोन्ही नेत्यांना ना पसंती दर्शवली असून उर्वरित चार टक्के लोकांनी उत्तरचं दिल नाही.

महाराष्ट्रा राज्यात एनडीएला एकेचाळीस टक्के तर इंडी आघाडीला एकेचाळीस टक्के मतं पडतील आणि इतर पक्षांना 18 टक्के मतं पडू शकतात. केंद्र सरकारच्या कामावर महाराष्ट्रातील 31 टक्के जनता खूप समाधानी आणि 30 टक्के जनता कमी समाधानी आहे. तर 35 टक्के जनता असमाधानी असल्याचे सी-व्होटर सर्वेच्या माध्यमातून समोर आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...